
चित्रपट सृष्टी असो वा टीव्ही, असे अनेक कलाकार आहेत, जे लोकांमध्ये आपली ओळख बनवल्यानंतर अभिनयाच करिअर सोडून देतात. त्यापैकीच एक नाव आहे रतन राजपूत.

रतनने टीव्ही विश्वात खूप कमी काळात आपली वेगळी ओळख बनवली. रतनने 'अगले जनम मोहे बिटिया ही कीजो' म्हणून लोकांमध्ये आपली ओळख बनवली. पण आता तिने अभिनय सोडला आहे.

रतनने सीरियल शिवाय टीव्हीवर आपला स्वंयवर सुद्धा रचलेला. शेवटची रतन संतोषी मां सीरियलमध्ये दिसलेली. 2020 मध्ये ही सीरियल टेलीकास्ट झालेली. 2018 मध्ये ही शूटिंग झालेली.

डिप्रेशनच्या आजारामुळे तिने अभिनय करिअरला सोडचिठ्ठी दिली. 2018 साली रतनच्या वडिलांच निधन झालं. त्याचं दु:ख ती झेलू शकली नाही. डिप्रेशनची बळ ठरली.

मीडियासोबत बोलताना रतन म्हणाला की, वडिलांच्या मृत्यूच्यावेळी आयुष्यातील सर्वात वाईट वेळेचा सामना केला. याचा सामना करण्यासाठी मानसोपचार तज्ञाकडे सुद्धा गेलेली. याच दरम्यान तिने मुंबई सोडून गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. तिथे तिने गावच्या लोकांसोबत शेतीची काम सुरु केली. चुलीवर जेवण सुद्धा बनवलं. आता गावातच राहतेय.