GK : भारतातील सर्वात अनोखी जमात, या ठिकाणी चक्क नवरदेव जातो नांदायला

Unique Tribe : भारतात विविध जाती धर्माचे लोक राहतात. अशा अनेक जाती जमाती आहेत, ज्यांच्या परंपरा वेगळ्या आणि अनोख्या आहेत. आज आपण अशा एका जमातीची माहिती जाणून घेणार आहोत जिथे चक्क नवरदेव नांदायला जातो.

| Updated on: Jan 23, 2026 | 7:38 PM
1 / 5
नवरदेव जातो नांदायला : मेघालयमधील खासी जमातीमध्ये लग्नानंतर मुलगी सासरी जात नाही, तर मुलगा आपल्या पत्नीच्या घरी राहायला येतो. येथे मुलगी नव्हे तर मुलगा नांदायला जातो.

नवरदेव जातो नांदायला : मेघालयमधील खासी जमातीमध्ये लग्नानंतर मुलगी सासरी जात नाही, तर मुलगा आपल्या पत्नीच्या घरी राहायला येतो. येथे मुलगी नव्हे तर मुलगा नांदायला जातो.

2 / 5
मातृसत्ताक व्यवस्था : या समाजात पितृसत्ताक नाही, तर मातृसत्ताक पद्धत चालते. म्हणजे कुटुंबाची ओळख, मालमत्ता आणि वंशाची परंपरा वडिलांकडून नाही, तर आईच्या नावावरून पुढे चालते.

मातृसत्ताक व्यवस्था : या समाजात पितृसत्ताक नाही, तर मातृसत्ताक पद्धत चालते. म्हणजे कुटुंबाची ओळख, मालमत्ता आणि वंशाची परंपरा वडिलांकडून नाही, तर आईच्या नावावरून पुढे चालते.

3 / 5
सर्वात लहान मुलीला वारसा हक्क : कुटुंबाची मालमत्ता आणि घराचा अधिकार सर्वात लहान मुलीला मिळतो, जिला खासी भाषेत 'का खाद्दूह' म्हटले जाते. तीच घराची प्रमुख असते आणि आई-वडिलांची देखभाल करण्याची जबाबदारीही तिच्यावर असते.

सर्वात लहान मुलीला वारसा हक्क : कुटुंबाची मालमत्ता आणि घराचा अधिकार सर्वात लहान मुलीला मिळतो, जिला खासी भाषेत 'का खाद्दूह' म्हटले जाते. तीच घराची प्रमुख असते आणि आई-वडिलांची देखभाल करण्याची जबाबदारीही तिच्यावर असते.

4 / 5
आईचे आडनाव : या समाजात मुले वडिलांचे नाही, तर आपल्या आईचे आडनाव लावतात. यामुळे कुटुंबाची ओळख आईच्या वंशाने टिकून राहते.

आईचे आडनाव : या समाजात मुले वडिलांचे नाही, तर आपल्या आईचे आडनाव लावतात. यामुळे कुटुंबाची ओळख आईच्या वंशाने टिकून राहते.

5 / 5
परंपरेचे उद्दिष्ट: ही परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. असे मानले जाते की, जुन्या काळी युद्धात पुरुषांचे मृत्यू जास्त होत असत, त्यामुळे वंशाचे संरक्षण करण्यासाठी आणि स्त्रियांना सुरक्षित व मजबूत करण्यासाठी ही व्यवस्था निर्माण करण्यात आली.

परंपरेचे उद्दिष्ट: ही परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. असे मानले जाते की, जुन्या काळी युद्धात पुरुषांचे मृत्यू जास्त होत असत, त्यामुळे वंशाचे संरक्षण करण्यासाठी आणि स्त्रियांना सुरक्षित व मजबूत करण्यासाठी ही व्यवस्था निर्माण करण्यात आली.