Marathi News Photo gallery Had I not become an IAS officer from UPSC, I would have become a scrap dealer; Success story of Deepak Rawat
UPSC तून IAS अधिकारी झाले नसते तर होणार होते भंगार विक्रेता; दीपक रावत यांची यशोगाथा
दीपकने एका मुलाखतीत सांगितले की जर ते UPSC परीक्षेत यशस्वी झाले नसते तर भंगार विक्रेता होणार होते , यामुळे वेगवेगळ्या गोष्टी शोधण्याची संधी मिळाली असती असे त्यांचे म्हणणे होते.
1 / 6
UPSC सारख्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात. ही एक पोस्ट आहे जी थेट जनतेशी संबंधित आहे. आयएएस अधिकारी म्हणून येणारी आव्हाने सोडवून लोकांमध्ये छाप सोडणारे अधिकारी लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहेत. असेच एक नाव आहे IAS दीपक रावत यांचे. दीपक रावत, उत्तराखंडचे आयएएस अधिकारी हे त्यांच्या कामांचा झटपट निपटारा करण्यासाठी ओळखले जातात. त्यांची यशोगाथा
2 / 6
24 सप्टेंबर 1977 रोजी जन्मलेले दीपक रावत मूळचे बारलोगंज, मसूरी, उत्तराखंडचे आहेत. त्यांनी आपले शालेय शिक्षण सेंट जॉर्ज कॉलेज, मसुरी येथे पूर्ण केले आणि दिल्ली विद्यापीठातील हंसराज कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. त्यांनी राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि जेएनयूमधून एमफिल केले.
3 / 6
उत्तराखंडमध्ये वाढलेला, ते आता लाखो लोकांचे प्रेरणास्थान आहेत. परंतु इतरांप्रमाणेच दीपकलाही त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागला. दीपक सांगतात की,ते 24 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांनी त्याला स्वतः पैसे कमवायला सांगितले आणि पॉकेटमनी देणे बंद केले. JRF मध्ये निवड झाल्यानंतर, त्याला दरमहा 8000 मिळू लागले ज्यातून तो आपला खर्च चालवत असे.
4 / 6
एका मुलाखतीत दीपकयांनी सांगितले होते की, ग्रॅज्युएशननंतर जेव्हा ते बिहारमधील काही विद्यार्थ्यांना भेटले तेव्हा त्याला यूपीएससीमध्ये रस निर्माण झाला. पहिल्या दोन प्रयत्नात परीक्षेत अपयशी ठरल्यानंतरही दीपकने हार मानली नाही.
5 / 6
दीपक रावत यांचा विवाह विजया सिंग या न्यायिक सेवेतील अधिकारी यांच्या सोबत झाला. त्या दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट म्हणून कार्यरत आहेत. दीपक रावत सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहेत. फेसबुक आणि यूट्यूबवर त्यांच्या नावाच्या फॅन पेजेसचे लाखो सबस्क्राइबर्स आहेत.
6 / 6
दीपक रावतने 2007 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि ऑल इंडिया रँक 12 मिळवला. मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (LBSNAA) येथे प्रशिक्षण पूर्ण केले. दीपकने एका मुलाखतीत सांगितले की जर ते UPSC परीक्षेत यशस्वी झाले नसते तर भंगार विक्रेताहोणार होते , यामुळे त्याला वेगवेगळ्या गोष्टी शोधण्याची संधी मिळाली असती असे त्यांचे म्हणणे होते.