
अनेकजण केस गळतीमुळे त्रस्त आहेत. अगदी कमी वयात केस पांढरी होणे किंवा गळणे आता सामान्य होत चालले आहे. हेच नाही तर काहीही उपाय केले तरीही केस गळती कमी होत नाही.

केस गळण्यास सुरूवात झाली की, आपल्यापैकी अनेकजण विविध उपाय करतात. मात्र, बऱ्याचदा फायदा होण्यापेक्षा नुकसान अधिक होते आणि केस गळतात.

जर तुम्ही देखील केस गळतीमुळे त्रस्त असाल तर अगदी घरगुती उपाय करूनही तुम्ही आरामात केस गळती थांबू शकता. यासाठी आपल्याला फार काही करावे लागणार नाहीये.

केस गळतीसाठी सर्वात महत्वाचे ठरते ते म्हणजे जास्वंदाचे फुल जास्वंदाच्या फुलाच्या मदतीने आपण केस गळतीची समस्या आरामात दूर करू शकता, जे फायदेशीर ठरते.

केस गळती रोखायची असेल तर खोबरेल तेल घ्या आणि ते गरम करा. त्यामध्ये फक्त जास्वंदाचे फुल स्वच्छ धुवून टाका आणि हे तेल केसांना लावा. आठवड्यातून दोनदा असे केल्याने केस गळतीची समस्या दूर होईल.