AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता जाणीवपूर्वक नो बॉल टाकला तर खैर नाही, बीसीसीआयने लागू केला कठोर नियम

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने 2026-2027 देशांतर्गत स्पर्धेसाठी काही कठोर नियम लागू केले आहे. यात सर्वात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय म्हणजे नो बॉल.. जर खेळाडूने जाणीवपूर्वक नो बॉल टाकला त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.

आता जाणीवपूर्वक नो बॉल टाकला तर खैर नाही, बीसीसीआयने लागू केला कठोर नियम
आता जाणीवपूर्वक नो बॉल टाकला तर खैर नाही, बीसीसीआयने लागू केला कठोर नियमImage Credit source: BCCI
| Updated on: Jul 22, 2026 | 4:32 PM
Share

बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी नियमात कठोर बदल केले आहेत. 2026-27 च्या देशांतर्गत क्रिकेट पर्वापूर्वी बीसीसीआयने खेळाच्या नियमात महत्त्वपूर्ण बदले केले आहेत. आता जाणीवपूर्वक नो बॉल टाकणाऱ्या गोलंदाजाला संपूर्ण सामन्यातून निलंबित केलं जाणार आहे. यात जाणूनबुजून फ्रंट फूट नो बॉल टाकल्यास संपूर्ण सामन्यासाठी गोलंदाजावर बंदी घालण्याची तरतूद केली आहे. तसेच सुधारित खेळण्याच्या नियमात बदल करताना दिवसाच्या खेळाचे शेवटचे षटक, डाव घोषित करणे किंवा सोडून देणे, विकेटकीपिंगचे नियम आणि ड्रिंकस ब्रेक दरम्यान प्रशिक्षकाच्या भूमिका यांचाही समावेश केला आहे. देशांतर्गत हंगामाची सुरूवात पुढच्या महिन्यात दुलीप ट्रॉफीने होणार आहे. त्यामुळे या नियमांची चर्चा आहे. नो बॉल नियम काय आहे आणि आधी काय तरतूद होती हे सविस्तर जाणून घेऊयात..

जाणीवपूर्वक नो बॉल टाकला तर…

नो बॉल प्रकरणात यापूर्वी गोलंदाजाला फक्त संबंधित डावापुरता गोलंदाजीपासून रोखलं जात होतं. पण बीसीसीआयने आता मेरीलेबोन क्रिकेट क्लबने सुचवलेल्या सुधारणांचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. पीटीआयला बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खेळण्याच्या अटीमध्ये नियम 41.8 मध्ये बदल करण्यात आला आहे. यानुसार गोलंदालाजा संपूर्ण सामन्यासाठी निलंबित करण्याचा निर्णय मैदानातील पंच घेतील. जाणीवपूर्वक फ्रंट-फूट नो-बॉल टाकल्यास किंवा खेळपट्टीवर न पडणारा चेंडू टाकल्यास दोषी आढळलेल्या गोलंदाजाला उर्वरित सामन्यासाठी गोलंदाजी करण्यास मनाई केली जाईल.

दिवसाच्या शेवटच्या षटकात विकेट पडली तर…

दुसरीकडे, बीसीसीआयने नियम 12.5.2 मध्ये देखील बदल केला आहे. आता दिवसाचे शेवटचे षटक खेळताना विकेट पडली तरी ते षटक पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे. यापूर्वी नियोजित अंतिम षटकात विकेट पडली तर पंच खेळ थांबवू शकत होते.

डाव घोषित करताना….

इतकंच काय तर संघांना सामन्याचा अंतिम डाव घोषित करण्यास किंवा सोडून देण्यासही बंदी घातली आहे. नियम 15.2 मध्ये बदल करण्यात आला असून आहे. यापूर्वी कृत्रिम निकाल मिळवण्यासाठी हा निर्णय घेतला जात होता. त्यामुळे खेळभावनेला ठेच पोहोचत होती.

ड्रिंक्स ब्रेकमध्ये प्रशिक्षक आखणार रणनिती

वनडे सामन्यात संघाच्या मुख्य प्रशिक्षकाला आता ड्रिंक्स ब्रेक दरम्याने मैदानात प्रवेश करता येणार आहे. आयसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा नियम लागू करण्याचा आधीच प्रस्ताव दिला आहे.

विकेटकीपिंगच्या नियमात बदल

विकेटकीपरला नव्या नियमात दिलासा देण्यात आला आहे. यापूर्वी गोलंदाजी गोलंदाजीसाठी धाव घेण्यापासून विकेटकीपरला ग्लव्ह्ज स्टम्पमागे ठेवावे लागत होते. जर तसं केलं नाही तर नो बॉल दिला जायचा. तसेच स्टम्पिंग अमान्य केली जायची. पण आता चेंडू टाकण्याच्या वेळीच ग्लव्हज स्टम्पच्या मागे असणं आवश्यक आहे.

Follow Us
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, सुप्रीम कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, सुप्रीम कोर्टातूत आता मोठा आदेश

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा.

अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक.

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक

Explainer: अण्णा हजारे ते अभिजीत दिपके… जंतर-मंतरवरच का धरणे? आंदोलनकर्त्यांच्या आवडत्या जागेचा माहिती आहे का इतिहास?.

Explainer: अण्णा हजारे ते अभिजीत दिपके… जंतर-मंतरवरच का धरणे? आंदोलनकर्त्यांच्या आवडत्या जागेचा माहिती आहे का इतिहास?

Kuldeep Yadav: टीम इंडियातून सतत डावललं, आता कुलदीप यादवने तडकाफडकी घेतला एक निर्णय, आता थेट दुसरीच वाट धरली.

Kuldeep Yadav: टीम इंडियातून सतत डावललं, आता कुलदीप यादवने तडकाफडकी घेतला एक निर्णय, आता थेट दुसरीच वाट धरली