Womens World Cup Final : पावसाचं विघ्न आलं, पण एकही बॉल न खेळता भारत ट्रॉफी जिंकणार; जाणून घ्या नेमकं कसं?

भारताला थेट जेते वर्ल्डकपची ट्रॉफी मिळू शकते. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे मोठा निर्णय होऊ शकतो. त्यासाठी आयसीसीचा नियम काय आहे, हे समजून घेऊ या..

| Updated on: Nov 02, 2025 | 4:23 PM
1 / 7
आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2025 स्पर्धेचा अंतिम सामन्याला काही क्षणात सुरुवात होणार आहे. परंतु पावसामुळे  मोठे विघ्न निर्माण झाले आहे. हा सामना 2 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता सुरू होणार होता.

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2025 स्पर्धेचा अंतिम सामन्याला काही क्षणात सुरुवात होणार आहे. परंतु पावसामुळे मोठे विघ्न निर्माण झाले आहे. हा सामना 2 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता सुरू होणार होता.

2 / 7

मात्र पावसामुळे या सामन्यासाठी नाणेफेकही होऊ शकलेली नाही. दरम्यान, पासवाची अशीच स्थिती राहिल्यास जेतेपदाची ट्रॉफी नेमकी कोणाला मिळणार? असा सवाल केला जात आहे.

3 / 7

खरं म्हणजे आयसीसीच्या नियमानुसार 2 ऑक्टोबर रोजीचा अंतिम सामना काही कारणास्तव न होऊ शकल्यास त्यासाठी आणखी एक रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे.

4 / 7

आज सामना न झाल्यास सोमवारी म्हणजेच 3 ऑक्टोबर रोजी हा अंतिम सामना खेळवला जाईल. आजच म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजीच सामना संपवण्याचा पंच प्रयत्न करतील.

5 / 7

रिझर्व्ह डे च्या दिवशीदेखील हा सामना न होऊ शकल्यास मात्र आयसीसीला मोठा निर्णय घ्यावा लागू शकते. याच निर्णयाअंतर्गत भारताला एकही चेंडू न खेळता जेतेपदाची ट्रॉफी मिळू शकते.

6 / 7

आज तसेच रिझर्व्ह डेच्या दिवशीही हा अंतिम सामना न होऊ शकल्यास आयसीसी भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही सघांना विजेता म्हणून घोषित करेल. या दोन्ही संघांमध्ये जेतेपदाची ट्रॉफी दिली जाईल.

7 / 7

परंतु असे होण्याची शक्यता फारच कमी आहे. सामना 2 नोव्हेंबर रोजी म्हणजेच आजच खेळवला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या सामन्यात नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us