
जर तुम्हाला निरोगी जगाचे असेल तर सर्वात महत्वाचे ठरते की, तुम्ही काय खाता? कारण आरोग्यासाठी निरोगी आहार सर्वात महत्वाचा ठरतो. शरीराला प्रथिनांची खूप जास्त गरज असते.

आहारात कायमच प्रथिने असणे महत्वाचे आहे. प्रथिन्यांचा जास्तीत जास्त समावेश आहारात करा. ज्यामुळे रोग तुमच्यापासून चार हात दूर राहतील.

शरीरातील प्रथिने कमी होण्याचे काही महत्नाचे संकेत आहेत. आपली नखे ठिसूळ होतात. यासोबतच रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होणे हे देखील मोठे संकेत आहेत.

जर तुम्ही वारंवार आजारी पडत असाल तर समजून घ्या की, तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाली आहे. अशावेळी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करा.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सर्वात महत्वाचे आंबट पदार्थ ठरतात. लिंबू, संत्री यासारख्या गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक असतात.