India Women vs Pakistan Women : पाकिस्तानची 55 धावांत दाणादाण; भारतीय वाघिणींचा कहर, विजयासाठी फक्त 56 धावांचं आव्हान
पाकिस्तानविरुद्धच्या महामुकाबल्यात भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत पाकिस्तानला अवघ्या 55 धावांत ऑलआऊट केलं. श्रीचरणी आणि प्रेमा रावत यांनी प्रत्येकी 3, दीप्ती शर्माने 2, तर शेफाली वर्माने 1 विकेट घेतली.

भारत आणि पाकिस्तानमध्ये दुबईत आज आशिया कपचा महामुकाबला सुरु आहे. पाकिस्तानने टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतू त्यांचा हा निर्णय त्यांच्याशीच अंगलट आला. फलंदाजीला उतरलेला संघाला जास्त प्रभावी कामगिरी करता आली नाही.
पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या पाकिस्तानच्या महिला संघाने केवळ 55 धावा केल्या यामध्ये पाकचा संघ ऑलआऊट झाला आहे.
भारतीय वाघिणींनी सुरुवातीपासूनच या सामन्यावर आपली पकड मजबूत ठेवली होती. भारताकडून श्रीचरणीने 3 तर दीप्ती शर्मा 2, शेफाली वर्मा 1 आणि प्रेमा रावत 3 विकेट घेतल्या आहेत.
दरम्यान कर्णधार हरमनप्रीतने आयेशा जफरची कॅच घेतली. जी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. श्रीचरणीच्या बॉलिंगवर आयेशाची विकेट गेली. तिने ही थरारक कॅच सातव्या षटकात घेतली.
त्यामुळे भारताला आता 20 ओव्हरमध्येल फक्त 56 धावा करायच्या आहेत. त्यामुळे हा सामना भारतच जिंकणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.