भारत-श्रीलंका गोल्ड मेडल मॅच पावसामुळे रद्द झाली तर कोणाला मिळणार सुवर्णपदक?
गोल्ड मेडलच्या या सामन्यावर पावसाचं सावट असल्याने चाहत्यांची चिंता वाढली आहे. महत्त्वाचं म्हणजे एशियन गेम्सच्या महिला क्रिकेटमधील नॉकआउट सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही.

जपानमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्स २०२६ मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने उपांत्य फेरीत बांगलादेशचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता सुवर्णपदकासाठी भारतीय संघाचा सामना श्रीलंका महिला संघाशी होणार आहे.
हा अंतिम सामना भारतीय वेळेनुसार सकाळी १०:३० वाजता सुरू होईल. तर कांस्यपदकासाठी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात सकाळी ५:३० वाजता सामना रंगेल.
जपानमधील सध्याचे हवामान पाहता अंतिम सामन्यावर पावसाचे सावट आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या स्पर्धेच्या अधिकृत नियमांनुसार नॉकआउट सामन्यांसाठी कोणताही 'राखीव दिवस' ठेवण्यात आलेला नाही.
जर पावसामुळे अंतिम सामना एकही चेंडू न खेळवता किंवा कोणताही निकाल न लागता रद्द झाला, तर स्पर्धेतील नियमानुसार ज्या संघाची क्रमवारी उत्तम आहे, त्यांना विजेता घोषित केले जाईल.
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रमवारीत आणि स्पर्धेच्या अधिकृत सीडिंगमध्ये भारतीय महिला संघ श्रीलंकेच्या खूप पुढे आहे. त्यामुळे पावसामुळे सामना रद्द झाल्यास या तांत्रिक नियमाच्या आधारे भारतीय महिला संघाला सुवर्णपदक मिळेल, तर श्रीलंकेला रौप्यपदकावर समाधान मानावे लागेल.