
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही शेवटची संधी आहे. भारतीय सैन्यात अग्निवीर भरती राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही जवळ आलीये.

Indianarmy.nic.in या साईटवर जाऊन उमेदवारांनी लगेचच अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही उद्याच आहे.

भारतीय लष्कराने जारी केलेल्या नोटीसनुसार अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे कमीत कमी 17 आणि जास्तीत जास्त 21 असावे. हेच उमेदवार अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा दहावी पास असावा. दहावी पास असणाऱ्यांसाठी खरोखरच ही एक मोठी संधी नक्कीच आहे.

परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 मार्च 2024 आहे. आपल्याला त्यापूर्वीच या भरतीसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.