Strait Of Hormuz : इराण आज भारतासोबत शत्रूसारखा वागला, जे वाटलं नव्हतं ते केलं
Strait Of Hormuz : इराण आणि भारतामध्ये चांगले मैत्री संबंध आहेत. इराणने स्वत: हे म्हटलं आहे. अमेरिका, इस्रायलने युद्ध सुरु केल्यानंतर इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुजचा जलमार्ग बंद केला. जगातील हा एक महत्वाचा तेल मार्ग आहे. इथून 20 टक्के तेल वाहतूक चालते.

इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधील जलवाहतूक रोखून धरली असली तरी त्यांनी भारताला नेहमीच सकारात्मक प्रतिसाद दिला. भारताने कूटनितीक मार्गाने आवाहन केल्यानंतर इराणने हॉर्मुजमधून भारताच्या तेल आणि गॅल टँकर्स जलवाहतुकीची परवानगी दिली. Getty Images

पण आज जे घडलं ते धक्कादायक आहे. गोंधळ वाढवणारी स्थिती आहे. भारताला इराणकडून अशी अपेक्षा नव्हती. जर, इराण भारताला चांगला मित्र मानतो, तर असं शत्रूसारखं वागायला नको होतं. निश्चितच यातून गोंधळात अजून भर पडणार आहे. Getty Images

आज स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधून पर्शियन गल्फमधून काही तेल टँकर्सनी जाण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना माघारी फिरण्याचा आदेश दिला. त्यामुळे जहाज चालकांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. इराण स्ट्रेट ऑफ हॉर्मुज ओपन करण्याचं आपलं आश्वासन पाळणार का, हा मुद्दा आहे. Getty Images

काल इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्ट्रेट ऑफ हॉर्मुज व्यावसायिक जल वाहतुकीसाठी पूर्णपणे खुलं असल्याचं जाहीर केलं. मग, आज तेल टँकर्सना माघारी का पाठवलं? यामुळे गोंधळ अजून वाढणार आहे. पाच ग्रीक आणि भारतीय तेल टँकर्सना इराणी नौदलाने माघारी पाठवून दिलं. हिंदुस्तान टाइम्सने ब्लूमबर्गच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. Getty Images

रविवारी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराणचे प्रतिनिधी दाखल होणार आहेत. सोमवारी दोन्ही देशांमध्ये दुसऱ्या फेरीची चर्चा होईल. मागच्या आठवड्यातील चर्चा अपयशी ठरली होती. दुसऱ्या राऊंडमध्ये युरेनियम संवर्धनाचा ताबा आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुज हे दोन महत्वाचे मुद्दे असणार आहेत. Getty Images