रागात जावेद अख्तर यांनी लिहिलं हे गाणं, ठरलं इतकं सुपरहिट की, ऐकताच गुणगुणतात लोक, 100 वेळा ऐकलं तरी भरत नाही मन

जावेद अख्तर यांनी रागात लिहिले होते या गाण्याचे बोल. जेव्हा हे गाणं प्रदर्शित झालं तेव्हा सर्वांनी केलं प्रचंड कौतुक. आजही हे गाणं इतकं सुपरहिट की एक ओळ जरी ऐकू आली तरी प्रत्येकजण हे गाणं दिवसभर गुणगुणतो.

| Updated on: Aug 18, 2026 | 1:33 PM
1 / 5
बॉलिवूडमधील अनेक गाणी त्यांच्या आवाजासोबत त्यांच्या भन्नाट किस्स्यांमुळेही लक्षात राहतात. ‘मैं हूं ना’ चित्रपटातील लोकप्रिय ‘तुमसे मिलके दिल का जो हाल’ या गाण्याच्या निर्मितीमागेही असाच एक रंजक किस्सा आहे. संगीतकार अनु मलिक यांनी एका जुन्या पॉडकास्ट मुलाखतीत या गाण्याच्या निर्मितीची आठवण सांगितली होती.

बॉलिवूडमधील अनेक गाणी त्यांच्या आवाजासोबत त्यांच्या भन्नाट किस्स्यांमुळेही लक्षात राहतात. ‘मैं हूं ना’ चित्रपटातील लोकप्रिय ‘तुमसे मिलके दिल का जो हाल’ या गाण्याच्या निर्मितीमागेही असाच एक रंजक किस्सा आहे. संगीतकार अनु मलिक यांनी एका जुन्या पॉडकास्ट मुलाखतीत या गाण्याच्या निर्मितीची आठवण सांगितली होती.

2 / 5
संगीतकार नकाश अजीज यांच्या पॉडकास्टमधील एका जुन्या क्लिपमध्ये अनु मलिक यांनी सांगितले की, हे गाणे तयार होण्यामागे दिग्दर्शिका फराह खान यांची महत्त्वाची भूमिका होती. फराह खान यांनी त्यांना कव्वाली बनवण्यास सांगितले. कव्वाली तयार करणे सोपे नसल्याने सुरुवातीला अनु मलिक थोडे घाबरले होते. मात्र त्यांनी आपल्या शैलीत या गाण्याची चाल तयार केली.

संगीतकार नकाश अजीज यांच्या पॉडकास्टमधील एका जुन्या क्लिपमध्ये अनु मलिक यांनी सांगितले की, हे गाणे तयार होण्यामागे दिग्दर्शिका फराह खान यांची महत्त्वाची भूमिका होती. फराह खान यांनी त्यांना कव्वाली बनवण्यास सांगितले. कव्वाली तयार करणे सोपे नसल्याने सुरुवातीला अनु मलिक थोडे घाबरले होते. मात्र त्यांनी आपल्या शैलीत या गाण्याची चाल तयार केली.

3 / 5
यानंतर या गाण्यासाठी गीतकार जावेद अख्तर यांच्यासमोर ही चाल सादर करण्यात आली. मात्र चाल ऐकल्यानंतर जावेद अख्तर नाराज झाले आणि त्यांनी सुरुवातीला तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यानंतर फराह खान यांनी त्यांना या संगीतावर गीत लिहिण्यास सांगितले.

यानंतर या गाण्यासाठी गीतकार जावेद अख्तर यांच्यासमोर ही चाल सादर करण्यात आली. मात्र चाल ऐकल्यानंतर जावेद अख्तर नाराज झाले आणि त्यांनी सुरुवातीला तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यानंतर फराह खान यांनी त्यांना या संगीतावर गीत लिहिण्यास सांगितले.

4 / 5
अनु मलिक यांच्या आठवणीनुसार, जावेद अख्तर यांनी त्यानंतर गाण्याचे बोल लिहिण्यास सुरुवात केली आणि अवघ्या 30 सेकंदांत गाण्याची पहिली ओळ तयार केली. त्यांच्या या क्षमतेचे अनु मलिक यांनी कौतुक केले. त्यांच्या मते, एखादे गाणे केवळ ऐकून विसरले जाऊ नये तर ते दीर्घकाळ लोकांच्या स्मरणात राहून इतिहासात नोंदले जावे, हीच खरी कसोटी आहे.

अनु मलिक यांच्या आठवणीनुसार, जावेद अख्तर यांनी त्यानंतर गाण्याचे बोल लिहिण्यास सुरुवात केली आणि अवघ्या 30 सेकंदांत गाण्याची पहिली ओळ तयार केली. त्यांच्या या क्षमतेचे अनु मलिक यांनी कौतुक केले. त्यांच्या मते, एखादे गाणे केवळ ऐकून विसरले जाऊ नये तर ते दीर्घकाळ लोकांच्या स्मरणात राहून इतिहासात नोंदले जावे, हीच खरी कसोटी आहे.

5 / 5
‘मैं हूं ना’ हा फराह खान यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट होता. या चित्रपटात शाहरुख खान, सुष्मिता सेन, झायेद खान, अमृता राव आणि सुनील शेट्टी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. भारत-पाकिस्तान शांतता उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटात अॅक्शन, रोमांस, कॉमेडी, कौटुंबिक भावना आणि देशभक्तीचा सुरेख मेळ पाहायला मिळाला.

‘मैं हूं ना’ हा फराह खान यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट होता. या चित्रपटात शाहरुख खान, सुष्मिता सेन, झायेद खान, अमृता राव आणि सुनील शेट्टी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. भारत-पाकिस्तान शांतता उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटात अॅक्शन, रोमांस, कॉमेडी, कौटुंबिक भावना आणि देशभक्तीचा सुरेख मेळ पाहायला मिळाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us