
एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळून प्यायल्यास वजन कमी होईल, असे अनेकांचे म्हणणे आहे. आयुर्वेद देखील रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिण्याची शिफारस करते. मात्र, खरोखरच सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिल्याने वजन कमी होते का? हे आपण जाणून घेणार आहोत.

लिंबू पचन सुधारण्यास मदत करते. क्लिंझरप्रमाणे शरीराला डिटॉक्सिफाय करते आणि व्हिटॅमिन सीचा प्रमुख स्रोत आहे.

आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते वजन कमी करण्यासाठी पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे आणि लिंबू केवळ चवच वाढवत नाही तर पोटावरची चरबी कमी करण्यासही मदत करते.

लिंबूमध्ये फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी-6, पेक्टिन आणि सायट्रिक ऍसिड असते. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करतात.

ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. कारण त्यात पेक्टिन असते जे भूक नियंत्रित करण्यास मदत करते आणि जंक फूडची भूक कमी करते. यामध्ये असलेले फ्लेव्होनॉइड्स चयापचय वाढवतात. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.