
ज्या लोकांना अॅनिमियाची तक्रार आहे. त्यांनी उन्हाळ्यात सत्तूपासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे. तज्ञ आणि डॉक्टर देखील अशा लोकांना ते खाण्याचा सल्ला देतात. सत्तू खाल्ल्याने हिमोग्लोबिनची पातळी वाढण्याची देखील शक्यता असते.

पोटात थंडावा टिकवण्यासाठी सत्तू खाल्ला जातो. मात्र, नेहमीच लक्षात ठेवा की, एक मर्यादीत प्रमाणात सत्तूचे सेवन करा, अतिरेक नकोच.

उन्हाळ्यात शरीराची ऊर्जा सर्वात जास्त खर्च होते आणि यामुळे लोकांना अनेकदा थकवा जाणवतो. अशा स्थितीत पौष्टिक तत्वांनी युक्त सत्तूचे पेय बनवून प्या.

जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी उन्हाळ्यात सत्तूचे सेवन अवश्य करावे. असे म्हटले जाते की हे वजन कमी करण्यासाठी मदत करते.

लोक उन्हाळ्यात घराबाहेर पडणे टाळतात. यावेळी उष्माघाताचा धोकाही असतो. मात्र, नेहमीच घराच्या बाहेर पडण्याच्या अगोदर सत्तूचे सेवन करा.