6 महिने LPG गॅस वापरणार नाही, महाराष्ट्रातील 3 गावांचा ऐतिहासिक निर्णय

Dhule : देशातल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत बसलेल्या धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातल्या तीन गावांनी 6 महिने एलपीजी गॅस न वापरण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Mar 27, 2026 | 3:45 PM
1 / 5
आखातातील युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे, अनेक ठिकाणी LPG गॅसचा तुटवडा जाणवत आहे. या इंधन टंचाईच्या संकटाचा सामना करण्यासाठी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बारीपाडा, मोहोगाव आणि चावडी पाडा ग्रामस्थांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.

आखातातील युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे, अनेक ठिकाणी LPG गॅसचा तुटवडा जाणवत आहे. या इंधन टंचाईच्या संकटाचा सामना करण्यासाठी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बारीपाडा, मोहोगाव आणि चावडी पाडा ग्रामस्थांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.

2 / 5
पद्मश्री चेतराम पवार यांच्या मार्गदर्शनाने तीनही गावांनी बैठक घेत पुढच्या सहा महिन्यापर्यंत एलपीजी गॅस न वापरण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून या काळामध्ये जंगलातील वाळलेले लाकडं आणि शेना पासून बनवलेल्या गौऱ्यांचा इंधन म्हणून वापर हे गावकरी करणार आहेत.

पद्मश्री चेतराम पवार यांच्या मार्गदर्शनाने तीनही गावांनी बैठक घेत पुढच्या सहा महिन्यापर्यंत एलपीजी गॅस न वापरण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून या काळामध्ये जंगलातील वाळलेले लाकडं आणि शेना पासून बनवलेल्या गौऱ्यांचा इंधन म्हणून वापर हे गावकरी करणार आहेत.

3 / 5
बारीपाडा, मोहगाव आणि चावडीपाडा या तीन गावांत सुमारे 4000 एवढी लोकसंख्या आहे, त्यापैकी 400 घरांमध्ये गॅस शेगड्या आहेत. मात्र या गॅस स्वयंपाक करणार नाही असा निर्णय गावकऱ्यांनी घेतला असून येणाऱ्या सहा महिन्यांपूर्वी पुढे देखील इंधनाची टंचाई भासल्यास हा निर्णय कायम ठेवणार असल्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेत देशाला आदर्श घालून दिला आहे.

बारीपाडा, मोहगाव आणि चावडीपाडा या तीन गावांत सुमारे 4000 एवढी लोकसंख्या आहे, त्यापैकी 400 घरांमध्ये गॅस शेगड्या आहेत. मात्र या गॅस स्वयंपाक करणार नाही असा निर्णय गावकऱ्यांनी घेतला असून येणाऱ्या सहा महिन्यांपूर्वी पुढे देखील इंधनाची टंचाई भासल्यास हा निर्णय कायम ठेवणार असल्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेत देशाला आदर्श घालून दिला आहे.

4 / 5
गॅस सिलिंडरऐवजी लाकूड, गोवऱ्या आणि पारंपरिक चुलींचा वापर केला जाणार आहे. मात्र, आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी धूरमुक्त चुली आणि पर्यावरणपूरक इंधन वापरावर विशेष भर दिला जाणार असून देशहित सर्वोच्च" ही भावना केंद्रस्थानी ठेवून, इंधन बचतीसाठी हा धाडसी निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

गॅस सिलिंडरऐवजी लाकूड, गोवऱ्या आणि पारंपरिक चुलींचा वापर केला जाणार आहे. मात्र, आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी धूरमुक्त चुली आणि पर्यावरणपूरक इंधन वापरावर विशेष भर दिला जाणार असून देशहित सर्वोच्च" ही भावना केंद्रस्थानी ठेवून, इंधन बचतीसाठी हा धाडसी निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

5 / 5
संभाव्य जागतिक इंधन संकटावर मात करण्यासाठी या तीन गावांनी उचललेले हे पाऊल केवळ जिल्ह्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे. या गावांच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

संभाव्य जागतिक इंधन संकटावर मात करण्यासाठी या तीन गावांनी उचललेले हे पाऊल केवळ जिल्ह्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे. या गावांच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Follow Us