AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चीनकडून भारताचा सर्वात मोठा घात! लपून उभा केला वॉटर बॉम्ब; कोट्यवधी लोक संकटात?

चीनने बांधलेले हे धरण बांगलादेश तसेच भारताची चिंता वाढवू शकते. कारण हे धरण भारतातील कोट्यवधी लोकांच्या अडचणी वाढवू शकते. म्हणूनच चीनच्या या धरणाला भारतात वॉटर बॉम्ब म्हटले जात आहे. या धरणामुळे चीन यारलुंग त्सांगपो या नदीवर आपले नियंत्रण मिळू शकतो, असे जाणकारांकडून सांगितले जात आहे.

चीनकडून भारताचा सर्वात मोठा घात! लपून उभा केला वॉटर बॉम्ब; कोट्यवधी लोक संकटात?
china dam (सांकेतिक फोटो)Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 30, 2026 | 5:57 PM
Share

China Vs India : चीन हा असा देश आहे जो भारताविरोधात नेहमी काहीरी कुरापती करत असतो. चीनच्या विस्तारवादी भूमिकेमुळे भारत नेहमीच या देशाबाबत सावध भूमिका घेत आलेला आहे. दरम्यान, आता याच चीनने भारताला मोठा धक्का दिला आहे. चीनच्या या निर्णयामुळे भारतापुढे भविष्यात मोठे संकट उभे राहू शकते. विशेष म्हणजे चीनने केलेल्या या कटकारस्थानाला वॉटर बॉम्ब म्हटले जात आहे. चीनने यारलुंग त्सांग नदीवर जगातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प उभा केला आहे.

7.7 अब्ज यूनिट विजेची निर्मिती होणार

चीनच्या या प्रकल्पाला मोटुओ किंवा मेडोग मेगा डॅम प्रोजेक्ट म्हणून ओळखले जात आहे. याच प्रकल्पाअंतर्गत चीनने शुक्रवारी दक्षिण-पश्चिमेतील सिचुआन प्रांतातील शुआंगजियांगकोऊ जलविद्युत केंद्राचे पहिला जनरेटिंग युनिट सक्रिय केले आहे. हे युनिट सुरू होताच जगातील सर्वात उंच धरणावर वीजनिर्मिती सुरू झालेली आहे. या जलविद्यूत प्रकल्पातून चीनला साधारण 20 लाख किलोवॅट वीज मिळणार आहे. हा प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित झाल्यास त्यातून 7.7 अब्ज यूनिट विजेची निर्मिती केली जाईल. शुआंगजियांगकोऊ येथील जलविद्यूत केंद्र 315 मीटर उंचीवर आहे.

धरण बांधण्यासाठी चीनला किती रुपये लागले?

मिळालेल्या माहितीनुसार चीनने जुलै 2025 मध्ये या धरणाची उभारणी सुरू केली होती. या प्रकल्पासाठी 168 अब्ज डॉलर लागण्याचा अंदाज आहे. हे धरण एवढे विशाल आहे की त्यातून अब्जो यूनिट विजेची निर्मिती केली जाईल.

भारतासाठी नेमका काय धोका?

चीनने बांधलेले हे धरण बांगलादेश तसेच भारताची चिंता वाढवू शकते. कारण हे धरण भारतातील कोट्यवधी लोकांच्या अडचणी वाढवू शकते. म्हणूनच चीनच्या या धरणाला भारतात वॉटर बॉम्ब म्हटले जात आहे. या धरणामुळे चीन यारलुंग त्सांगपो या नदीवर आपले नियंत्रण मिळू शकतो, असे जाणकारांकडून सांगितले जात आहे. चीनमधील यारलुंग त्सांगपो ही नदी भारतातील अरुणाचल प्रदेश, आसाम या राज्यांतून जाते. तसेच बांगलादेशातही ही नदी वाहते. भारतात या नदीला ब्रह्मपुत्रा तरे बांगलादेशात जमुना या नावांनी ओळखले जाते. त्यामुळे या धरणामुळे भारतात येणाऱ्या पाण्यावर चीन नियंत्रण मिळवू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता भविष्यात काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ