
सध्या राज्यात लिंगपिसाट अशोक खरात प्रकरण चांगेच चर्चेत आहे. दररोज या प्रकरणी वेगवेगळे खुलासे होताना दिसत आहेत. या प्रकरणी 50 पेक्षा जास्त व्हिडीओ समोर आले. या व्हिडीओने खळबळ माजली. या प्रकरणावर अनेक राजकीय नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिली. आता अभिनेत्री ममता कुलकर्णी देखील या भोंदूबाबावर स्पष्टच बोलली आहे.

ममता कुलकर्णीने या भोंदूबाबाकडे जाणाऱ्या महिलांना सवाल केला आहे की, "जर तो मर्यादा ओलांडत होता तर तुम्ही लाथ मारुन यायची होती, फटके मारुन यायचे होते. मी आली होती हात दाखवायला तुम्ही मला काय करताय?"

अशोक खरात स्वत:ला शंकराचा अवतार मानत होता असे सांगताच ममता कुलकर्णी म्हणाली, "तो त्याचा भ्रम आहे. त्याला भ्रम झाला आहे. तो भ्रम असतो. जेव्हा तो पूर्ण जागरुक होईल तेव्हा तो असे बोलूच शकत नाही की मी तो अवतार आहे. जागरुत होणे ही परबह्म सिध अवस्था आहे. तो अशामध्ये लागतच नाही. 50 बायका नेऊन. तो याच्या आड बिचाऱ्या बायकांना, निर्दोष बायकांना... मी तर असे म्हणेन की या निर्दोष बायकांचे जे पती आहेत त्यांनी बायकांना सांभाळून घ्या. हे नालायक लोक आहेत."

"मी एवढच म्हणेन की महिलांना पण विचारा. काय माहिती त्यांचा सहभाग असेल यामध्ये. मी तर त्यांना दोषी मानत नाही. निर्दोष असतील त्यांना क्षमा असावी. त्यांना विचारा जाऊन. पण मला हे नाही कळत की तुम्ही ज्योतिषाकडे गेलात की तुम्ही काय करण्यासाठी गेल्यात साधूकडे? आणि तुम्हाला तुमच्या मर्यादा माहिती नाही का? जर तो मर्यादा ओलांडतोय तर तुम्ही लाथ मारुन यायची होती, फटके मारुन यायची होती" असे ममता कुलकर्णी म्हणाली.

शेवटी तिने म्हटले की, मी आली होती हात दाखवायला तुम्ही मला काय करताय? आणि आपण मराठी लोक आहोत, थोडी एक कानाखाली वाजवायची, निघून यायचं. त्यालाच उटलं म्हणायचं महादेव आहेस ना नालायक, हरामखोर असं म्हणायचं.