
गेल्या पाच दिवसांपासून मनोज जरांगे यांचे उपोषण चालू होते. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे. हैदराबाद, सातारा गॅझेट लागू करावे अशी मागणी त्यांनी केली होती.

त्यांच्या एका आवाहनाने मुंबईत हजारो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले होते. 29 ऑगस्टपासून बीएमसी, चर्चगेट, आझाद मैदान या परिसरात मराठा आंदोलकांनी ठाण मांडले होते. हजारो वाहने मुंबईच्या रस्त्यावर दिसत होते.

दरम्यान, उपोषणाच्या पाचव्या दिवशी मनोज जरांगे यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. सरकारने हैदराबाद गॅझेट लागू केले जाईल, असे सरकारने जाहीर केले आहे.

MANOJ JARANGE PATIL

राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर जरांगे भावुक झाले आहेत. ते आनंदात ढसाढसा रडल्याचे पाहायला मिळाले आहे. सरकारच्या या निर्णयानंतर आता मराठा समाजात आनंद व्यक्त केला जात आहे.