इथं नवरदेव जातो नांदायला, बायकोच्या घरी राहून सासऱ्याचं करतो काम; तुम्हालाही वाटेल आश्चर्य!
भारतीय लग्नसंस्थेतही पुरुषप्रधान संस्कृतीची झलक दिसते. म्हणूनच लग्नानंतर भारतात मुलगी नवरदेवाच्या घरी नांदायला जाते. आपल्या आईवडिलांना सोडून तिला नांदायला यावं लागतं.

या जगात सगळीकडेच लग्नव्यवस्था पाहायला मिळते. प्रदेशानुसार लग्नाचे नियम, परंपरा बदलत राहतात. भारतातही प्रत्येक राज्यात लग्नाच्या प्रथेमध्ये बदल दिसून येतात. भारतातील अशाच एका ठिकाणच्या लग्नाची सगळीकडे चर्चा होत आहे. इथे चक्क नवरदेव सासरी नांदायला जातो. (सांकेतिक फोटो)

भारताची संस्कृती ही पुरुषप्रधान आहे. त्यामुळे पुरुषाला केंद्रस्थानी ठेवूनच सगळे निर्णय घेतले जातात. भारतीय लग्नसंस्थेतही पुरुषप्रधान संस्कृतीची झलक दिसते. म्हणूनच लग्नानंतर भारतात मुलगी नवरदेवाच्या घरी नांदायला जाते. आपल्या आईवडिलांना सोडून तिला नांदायला यावं लागतं. (सांकेतिक फोटो)

परंतु भारतातच असे एक ठिकाण आहे, जिथे नवरी नव्हे तर नवरदेव आपल्या सासरी नांदायला जातो. मेघालय राज्यातील गारो आणि खासी जमातींमध्ये लग्नाची ही प्रथा आढळते. या जमातींमध्ये सगळी व्यवस्था ही मातृसत्ताक असते. (सांकेतिक फोटो)

त्यामुळेच लग्न झाल्यानंतर नवरदेव आपले घर सोडून थेट नवरीच्या घरी नादांयला जातो. नवरीच्या घरीच नवरदेव कायमचे राहतो. तिथे राहून तो सासऱ्याच्या कामात मदत करतो. या जमातीमध्य कुटुंबातील छोट्या मुलीलाच पूर्ण संपत्तीची मालकीण समजले जाते. (सांकेतिक फोटो)

या जमातींमध्ये नवऱ्या मुलाला (सांकेतिक फोटो)आपल्या सासरी आदर्श जावई म्हणून राहावे लागते. स्त्रीप्रधान संस्कृती असल्याने तिथे लग्नाची अशी पद्धत आहे. भारतात इतरही काही ठिकाणी लग्नाची ही प्रथा पाहायला मिळते.