सापाच्या या भागात अडकलेला असतो त्याचा जीव, चुकूनही मार लागताच तडफडून होतो मृत्यू!
आपला फणा बाहेर काढून साप स्वत:चे रक्षण करण्याचा प्रयत्न करतो. प्रसंगी तो हल्ला करायला आलेल्या व्यक्तीला, प्रण्याला दंशदेखील करतो. हल्ला करणारा पळून गेला की तेवढ्याच वेळात साप स्वत:चे रक्षण करण्यासाठी तिथून पळून जातो.

आपल्या समाजात सापाबद्दल अनेक मिथकं आहेत. साप दूध पितो, साप सूड घेतो, साप डुख धरतो अशा अनेक अंधश्रद्धा समाजामध्ये आहेत. काही साप हे विषारी असतात त्यामुळे लोक साप दिसला की त्याला मारून टाकतात.

साप दिसला की लोक काठी किंवा अन्य शस्त्र घेऊन सापाला मारून टाकतात. तर दुसरीकडे स्वत:चे रक्षण करण्यासाठी साप वेगवेगळ्या युक्त्या वापरतो. यातीलच एक युक्ती म्हणजे धोका वाटला की साप फणा बाहेर काढतो.

आपला फणा बाहेर काढून साप स्वत:चे रक्षण करण्याचा प्रयत्न करतो. प्रसंगी तो हल्ला करायला आलेल्या व्यक्तीला, प्रण्याला दंशदेखील करतो. हल्ला करणारा पळून गेला की तेवढ्याच वेळात साप स्वत:चे रक्षण करण्यासाठी तिथून पळून जातो.

सापाचे शरीर हे फार लवचिक असते. जमिनीत थोडेजरी छिद्र किंवा भेग दिसली की साप लगेच त्यात जाऊन नाहीसा होतो. घनदाट झाडी, गवत यामध्येही साप लगेच लपून बसतो. सापाला थोडीजरी इजा झाली तर तो मरण्याची शक्यता जास्त असते. सापाच्या शरीरावर त्याचा समोरचा मुखाचा भाग खूपच महत्त्वाचा असतो.

कारण याच मुखाद्वारे साप फणा काढून दंश करतो. याच मुखाद्वारे साप अन्न खातो. त्यामुळे कोणत्याही हल्ल्यात सापाच्या मुखाला इजा झाली तर तो घायाळ होतो आणि तो मरून जाण्याची शक्यता असते. म्हणूनच साप दिसला की त्याच्या मुखाला इजा न करता त्याला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून द्यावे.