
आर्य चाणक्य म्हणतात की घरातील ज्येष्ठ नागरिकांचा ज्याप्रमाणे आपण त्यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतो, त्याप्रमाणे प्रत्येक पत्नीला देखील सकाळी आणि संध्याकाळी आपल्या पतीचे चरण स्पर्श करायला पाहिजे. यामुळे पती-पत्नीमधील प्रेम वाढते.

आर्य चाणक्य यांनी देखील आपल्या चाणक्य नीती या ग्रथामध्ये स्त्रीयांच्या गुणांची चर्चा केली आहे. आज त्याला शकडो वर्ष उलटली मात्र चाणक्य यांनी स्त्रीयांबद्दल जे विचार सांगितले ते आजही तेवढेच व्यवाहारिक वाटतात.

आर्य चाणक्य म्हणतात की जेव्हा पती संध्याकाळी कामावरून घरी येतो तेव्हा पत्नीने ही गोष्ट नियमित केली पाहिजे, त्यामुळे पतीचं पत्नीवरील प्रेम वाढत जाईल आणि संसारात आनंद, सुख, समृद्धी नांदेल.

चाणक्य नीतीनुसार स्त्री ही साहसाची मुर्तीमंत रूप आहे.जेव्हा कुटुंबावर एखादं संकट येत तेव्हा स्त्री स्वत: पुढे होऊन त्यातून मार्ग काढते, आपल्या पतीचं, मुलाचं, कुटुंबाचं संरक्षण करते.

चाणक्य पुढे म्हणतात जी स्त्री आपल्या गुणांनी आणि साहसाने आपल्या कुटुंबाचं संरक्षण करते ती स्त्री राष्ट्राला एक नवी दिशा देते. अशी स्त्री ही कौतुकास पात्र असते. राष्ट्राच्या विकासात तिचं योगदान असतं.

चाणक्य म्हणतात स्त्रीमध्ये पुरुषाच्या तुलनेत भूख दुप्पट, लाज चार पट साहस सहा पट आणि काम भावना आठ पट अधिक असते.

आर्य चाणक्य सांगतात की स्त्रीसोबत बोलताना नेहमी आदरपूर्वक बोललं पाहिजे, त्यांचा आपमान करता कामा नाही. कारण स्त्रीया आपला आपमान कधीही विसरत नाहीत.