
देशभरातील कोट्यवधी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या 2000 रुपयांची वाट पाहात आहेत. अगोदर हे पैसे फेब्रुवारी महिन्यातच दिले जातील, असे सांगितले जात होते. परंतु अद्याप शेतकऱ्यांना हे पैसे मिळालेले नाहीत. असे असतानाच आता या पैशांबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

पीएम शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये दिले जातात. तीन टप्प्यांत ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवली जाते. आता शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत 22 वा हप्ता मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हा 22 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर येत्या 13 मार्च रोजी येण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 मार्च रोजी आसामच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मोदी या हप्त्याची घोषणा करतील, अशी शक्यता व्यक्त केली जाते. परंतु याबाबतची अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा सरकारने केलेली नाही.

यायाधीचा 21 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 2025 सालाच्या शेवटी पाठवण्यात आला होता. सामान्यत: प्रत्येक चार महिन्यांनी हे पैसे शेतकऱ्यांना दिले जातात. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नाही, त्यांना हा हप्ता मिळणार नाही.

न