लग्नानंतर कधीही करु नका ही एक चूक, नाहीतर संसाराची होईल राखरांगोळी

प्रेमानंद महाराजांनी लग्नानंतरच्या नातेसंबंधावर महत्त्वाचा सल्ला दिला आहे. प्रामाणिकपणाच्या नावाखाली प्रत्येक गोष्ट सांगणे अनावश्यक असून, काही गोष्टी मनात ठेवल्यास नात्यात शांतता टिकून राहते.

| Updated on: Oct 21, 2025 | 1:42 PM
1 / 8
लग्नानंतर पती-पत्नीच्या नात्यात अनेक कारणांमुळे कटुता येते. यातील एक महत्त्वाचे कारण म्हणजे जुने प्रेमसंबंध आणि भूतकाळ. लग्नानंतर पतीने किंवा पत्नीने आपल्या जोडीदारासमोर जुन्या प्रेमसंबंधांचा उल्लेख करावा की नाही, यावरुन अनेक जोडपी गोंधळतात.

लग्नानंतर पती-पत्नीच्या नात्यात अनेक कारणांमुळे कटुता येते. यातील एक महत्त्वाचे कारण म्हणजे जुने प्रेमसंबंध आणि भूतकाळ. लग्नानंतर पतीने किंवा पत्नीने आपल्या जोडीदारासमोर जुन्या प्रेमसंबंधांचा उल्लेख करावा की नाही, यावरुन अनेक जोडपी गोंधळतात.

2 / 8
पण आता वृंदावनचे संत प्रेमानंद महाराज यांनी आपल्या प्रवचनात याबद्दल स्पष्ट मत मांडले आहे. जे आजच्या पिढीसाठी नक्कीच उपयोगी ठरेल. प्रेमानंद महाराजांना नुकतंच याबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट उत्तर दिले.

पण आता वृंदावनचे संत प्रेमानंद महाराज यांनी आपल्या प्रवचनात याबद्दल स्पष्ट मत मांडले आहे. जे आजच्या पिढीसाठी नक्कीच उपयोगी ठरेल. प्रेमानंद महाराजांना नुकतंच याबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट उत्तर दिले.

3 / 8
पती-पत्नीने जास्तीत जास्त प्रयत्न करून जुन्या प्रेमाचा उल्लेख टाळावा. जर तुम्ही जुन्या संबंधांचा उल्लेख केला तर सध्याच्या नात्यातील प्रेम कमी होते. याचा सुखी संसारावर नकारात्मक परिणाम होतो.

पती-पत्नीने जास्तीत जास्त प्रयत्न करून जुन्या प्रेमाचा उल्लेख टाळावा. जर तुम्ही जुन्या संबंधांचा उल्लेख केला तर सध्याच्या नात्यातील प्रेम कमी होते. याचा सुखी संसारावर नकारात्मक परिणाम होतो.

4 / 8
जर भूतकाळात तुमचे कोणाशी प्रेमसंबंध असतील आणि त्यानंतर तुमचे लग्न दुसऱ्या व्यक्तीशी झाले असेल, तर त्या गोष्टी तिथेच विसरून जाव्यात. असे माना की ती गोष्ट गेल्या जन्माची होती. अजिबात या गोष्टींचा उल्लेख करण्याची चूक करू नका, असे प्रेमानंद महाराज म्हणाले.

जर भूतकाळात तुमचे कोणाशी प्रेमसंबंध असतील आणि त्यानंतर तुमचे लग्न दुसऱ्या व्यक्तीशी झाले असेल, तर त्या गोष्टी तिथेच विसरून जाव्यात. असे माना की ती गोष्ट गेल्या जन्माची होती. अजिबात या गोष्टींचा उल्लेख करण्याची चूक करू नका, असे प्रेमानंद महाराज म्हणाले.

5 / 8
कारण जर तुम्ही त्याला सत्य सांगितले, तरीही जोडीदाराच्या मनात तुमच्यासाठी संशयाची जागा निर्माण होईल. यामुळे कुटुंब विस्कळीत होण्याची शक्यता आहे, असे प्रेमानंद महाराज म्हणाले.

कारण जर तुम्ही त्याला सत्य सांगितले, तरीही जोडीदाराच्या मनात तुमच्यासाठी संशयाची जागा निर्माण होईल. यामुळे कुटुंब विस्कळीत होण्याची शक्यता आहे, असे प्रेमानंद महाराज म्हणाले.

6 / 8
प्रेमानंद महाराजांनी स्पष्ट केले की, लग्नानंतर स्त्रीने आपल्या पतीला परमेश्वर मानले पाहिजे. तसेच पुरुष आणि स्त्री या दोघांनीही कधीही परक्या व्यक्तीकडे आकर्षण म्हणून पाहू नये. या दोघांनीही एकमेकांप्रति पूर्ण निष्ठावान असणे आवश्यक आहे, असेही प्रेमानंद महाराज म्हणाले.

प्रेमानंद महाराजांनी स्पष्ट केले की, लग्नानंतर स्त्रीने आपल्या पतीला परमेश्वर मानले पाहिजे. तसेच पुरुष आणि स्त्री या दोघांनीही कधीही परक्या व्यक्तीकडे आकर्षण म्हणून पाहू नये. या दोघांनीही एकमेकांप्रति पूर्ण निष्ठावान असणे आवश्यक आहे, असेही प्रेमानंद महाराज म्हणाले.

7 / 8
आज समाजात लोक प्रामाणिकपणाच्या नावाखाली भूतकाळातील प्रत्येक गोष्ट जोडीदाराला सांगतात. पण प्रेमानंद महाराजांच्या मते, प्रत्येक गोष्ट जोडीदाराला सांगणे आवश्यक नाही.

आज समाजात लोक प्रामाणिकपणाच्या नावाखाली भूतकाळातील प्रत्येक गोष्ट जोडीदाराला सांगतात. पण प्रेमानंद महाराजांच्या मते, प्रत्येक गोष्ट जोडीदाराला सांगणे आवश्यक नाही.

8 / 8
खासकरून जर ती गोष्ट जुन्या संबंधांशी जोडलेली असेल. नात्यातील शांती आणि विश्वास टिकवून ठेवण्यासाठी काही गोष्टी मनात ठेवणेच योग्य आहे, असा मोलाचा सल्ला प्रेमानंद महाराजांना विवाहित जोडप्यांना दिला आहे.

खासकरून जर ती गोष्ट जुन्या संबंधांशी जोडलेली असेल. नात्यातील शांती आणि विश्वास टिकवून ठेवण्यासाठी काही गोष्टी मनात ठेवणेच योग्य आहे, असा मोलाचा सल्ला प्रेमानंद महाराजांना विवाहित जोडप्यांना दिला आहे.