
साताऱ्यातील महाबळेश्वर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांचा अजूनदेखील संपर्क तुटलेला आहे. तब्बल एक महिना होत आला तरी या गावांना जोडणारे रस्ते अद्यापही दुरुस्त झालेले नाहीत. याचा फटका या भागातील वयस्कर लोकांना बसू लागला आहे.

महाबळेश्वर तालुक्यातील खरोशी या गावातील 70 वर्षाच्या रामचंद्र कदम यांना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रामचंद्र कदम यांना गावातील तरुणांनी टोपलीतून नदीपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा उपचाराविना वाटेतच मृत्यू झाला.

नदीतून बोटीने रामचंद्र कदम यांना तापोळा या ठिकाणी उपचारासाठी नेलं जात होतं. मात्र रस्त्याअभावी वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली आहे.

त्यामुळे सातारा जिल्हा प्रशासनाने आता तरी जागे होऊन या गावांना जोडणारे रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

70 वर्षाच्या रामचंद्र कदम यांना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रामचंद्र कदम यांना गावातील तरुणांनी टोपलीतून नदीपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा उपचाराविना वाटेतच मृत्यू झाला.