
'शिवा' मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. शिवाच्या मनात आशुसाठी भावना दृढ होत असतात. आशु एका प्लांटच्या व्हिजिटसाठी जाताना शिवाला सोबत घेऊन जातो. परत येताना त्यांची गाडी एका जंगलात बंद पडते आणि त्यांना एका आदिवासी पाड्यात रात्रभर थांबाव लागतं.

तिथे त्यांना नवरा- बायको असण्याचं नाटक करावं लागतं. आदिवासी पाड्यावर दोघं एकत्र डान्स करतात, एकाच ताटात जेवतात. अशातच भविष्य सांगणारा एकजण आशुला सांगतो की, "तुझ्या होणार्या बायकोचं आणि आईचं काही काळ पटणार नाही." आशुला हे दिव्याबद्दलचं भविष्य असल्याचं वाटतं.

शिवाला तिथल्या बायका एका झाडाचं पान देतात आणि मनात इच्छा मागून ते चुरगळायला सांगतात. शिवाला आशुसोबत एकत्र वेळ घालवल्याने छान वाटतंय आणि ती मनात इच्छा व्यक्त करते की ती आणि आशु कधी एकत्र येतील का? हीच इच्छा मनात बोलून ती पान चुरगळते.

पान चुरगळ्यानंतर शिवाचा तिचा हात लाल होतो. त्यारात्री आशु झोपेत तिचा हात हाती घेऊन झोपतो. ते दोघं परत आल्यावर शिवा गँगसमोर कबुली देते की तिला आशु आवडू लागला आहे. शिवाच्या वागण्यात झालेला बदल आज्जीलाही जाणवतोय.

आशुने चांगला रिपोर्ट तयार केला म्हणून रामभाऊ त्याला शाबासकी देतात आणि यामुळे खुश होऊन आशु शिवाला कानातले गिफ्ट करतो. तर शिवा, आशुसाठी कविता करताना दिसते. सगळी गँग एकत्र येऊन दिव्या आणि आशुचं लग्न मोडायचा प्लॅन बनवतात. ते शिवाला म्हणतात की तुझ्या मनातल्या भावना आशुला सांग, त्यासाठी ते गॅरेज सजवतात.