
अमृता अरोरा - अमृता हिच्यावर नीशा राणाचा पती शकील लडक याला चोरल्याचा आरोप आहे. अमृता अरोरा आणि शकील यांचं 2009 मध्ये लग्न झालं. अमृता अरोरा आणि नीशा राणा एकमेकांच्या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या असं दोखील सांगितलं जातं.

रवीना टंडन - बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन हिने अनिल थडानी यांच्यासोबत लग्न केलं. अनिल यांचं रवीना हिच्यासोबत दुसरं लग्न आहे. अनिल, रवीना हिच्या खास मैत्रिणीचे पती होते. मैत्रिणीचा संसार मोडल्यामुळे अभिनेत्रीला ट्रोल देखील करण्यात आलं होतं.

शिल्पा शेट्टी - शिल्पा हिने 2009 मध्ये उद्योजक राज कुंद्रा याच्यासोबत लग्न केलं. शिल्पासोबत राज याचं दुसरं लग्न आहे. राज याच्या पहिल्या पत्नीचं नाव कविता आहे. रिपोर्टनुसार, घटस्फोटानंतर कविता हिने शिल्पावर संसार मोडल्याचे आरोप केले. आज माझं आयुष्य शिल्पा जगत आहे... असं देखील कविता म्हणालेली.

स्मृती इराणी - टीव्ही अभिनेत्री आणि राजनेता स्मृती इराणी यांनी देखील मैत्रिणीच्या पतीसोबत लग्न केलं. यावर स्मृती इराणी म्हणाल्या होत्या, 'मोना माझ्यापेक्षा 13 वर्ष मोठया आहेत. त्यामुळे त्या माझ्या लहानपणीच्या मैत्रीण कधी असूच शकत नाहीत. तुमचे वाद माझ्यासोबत आहेत. त्यामुळे खासगी आयुष्याबद्द काहीही बोलू नका...'

सोनिया कपूर - हिमेश रेशमिया याने दुसऱ्या प्रेमासाठी 22 वर्षांचा संसार मोडला. गायकाच्या पहिल्या पत्नीचं नाव कोमल होतं. तर सोनिया आणि कोमल चांगल्या मैत्रिणी होत्या... पण सानिया हिच्यासाठी हिमेश याने कोमल हिला घटस्फोट दिला.

अभिनेत्री श्रीदेवी - 1996 मध्ये श्रीदेवी आणि बोनी कपूर यांनी लग्न केलं. तेव्हा बोनी कपूर विवाहित होते. एककाळ असा होता, जेव्हा श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नी मोना कपूर एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी होत्या. मोना यानी श्रीदेवी यांना स्वतःच्या घरात राहण्यासाठी जागा दिली. पण मैत्रिणीच्याच पतीसोबत श्रीदेवी यांनी संसार थाटला.