AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijeet Dipke: अभिजीत दीपके झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनात सहभागी होणार? त्या प्रश्नावर काय दिलं उत्तर? थेट म्हणाला…

Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी रांची येथे सुरु असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी थेट राजकीय पक्षांच्या आंदोलनावर लाठीचार्ज होत नाही असे म्हटले आहे.

Abhijeet Dipke: अभिजीत दीपके झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनात सहभागी होणार? त्या प्रश्नावर काय दिलं उत्तर? थेट म्हणाला...
Abhijeet DipkeImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Aug 11, 2026 | 12:40 PM
Share

झारखंडमध्ये भरती परीक्षेत झालेल्या कथित घोटाळ्यावरून विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. रांचीमध्ये हजारो विद्यार्थी एकवटले असून जोरदार आंदोलन करत आहेत. या विद्यार्थ्यांनी विधानसभेच्या दिशेने कूच केली. विधानसभेपर्यंत जाण्याच्या मार्गात एकूण सहा बॅरिकेड्स होते. हे सहाही बॅरिकेड्स विद्यार्थ्यांनी पार केले. विद्यार्थी विधानसभेच्या अगदी जवळ आल्याने त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर पाण्याचा मारा केला आहे. त्यानंतर लाठीचार्ज केल्याचे समोर आले. आता यावर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते या आंदोलनात सहभागी होणार की नाही? हे त्यांनी सांगितले आहे.

काय म्हणाले अभिजीत दिपके?

नुकताच अभिजीत दीपके यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना रांची आंदोलनात सहभागी होणार का? असे विचारण्यात आले. त्यावे दीपके म्हणाले. देवेंद्र महतो हे झारखंडमध्ये जे काही चालू आहे ते त्याचे लीडर आहेत. त्यांनी जे नेतृत्व केले ते खूप चांगल्या पद्धतीने केलं आहे. आमची टीम तिथं आहे त्यांना समर्थन करत आहे. काल हॉस्पिटलमध्येसुद्धा आमची टीम त्यांच्यासोबत थांबली होती. आमच्या टीम सोबत कॉल झाला त्यांची माहिती घेतली. आमचा विचार हा आहे की जास्तीत जास्त विद्यार्थी कसे समोर येतील. देवेंद्र हे लीडर आहेत तिथे जाऊन आम्हाला हायजॅक नाही करायचं. आम्ही आमची टीम त्या ठिकाणी पाठवली आहे आम्ही त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट मध्ये आहोत.

आंदोलनावर प्रतिक्रिया देत ते म्हणाले, काल झारखंडमध्ये जे काही ते फार वाईट होते. 20 तारखेला जंतर मंतरमध्ये दृश्य होतं तसेच दृश्य झारखंडमध्ये पाहायला मिळाले. तेथे विद्यार्थांवर टीअर गॅस सोडण्यात आला, लाठीचार्ज करण्यात आला. मला हे कळतच नाहीये की जेव्हा एखादा राजकीय पक्ष आंदोलन करतो तेव्हा लाठीचार्ज किंवा टीअर गॅसचा वापर का केला जात नाही? हा टीअर गॅस आणि लाठीचार्ज नेहमी फक्त विद्यार्थ्यांवर का केला जात आहे?

पुढे अभिजीत दीपके म्हणाले, या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या देवेंद्र महतोजी यांच्याशी माझे बोलणे झाले. ते गेल्या ९ दिवसांपासून उषोण करत आहेत. त्यानंतरही पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. त्यांना मारण्यात आले आहे. ते सध्या रुग्णालयामध्ये आहेत. त्यांची प्रकृती आता चिंताजनक आहे. त्यामुळे कुठे तरी जाऊन सर्व सरकारला विचार करायला हवा की जंतर मंतर असो किंवा झारखंड असो विद्यार्थ्यांवर असे अत्याचार करुन काय मिळत आहे? हे विद्यार्थी त्यांच्या हक्कासाठी लढत आहेत. भविष्यासाठी लढत आहे कोणत्याही वोट बँकसाठी लढत नाहीत. त्यांच्यावर अशा प्रकारे लाठीचार्ज झाला नाही पाहिजे. त्यांना अशी क्रूरुपणाची वागूण मिळू नये.

विद्यार्थ्यांच्या मागण्या काय?

सरकार आणि विद्यार्थ्यांमधील मुख्य मुद्दा सीजीएल परीक्षेच्या अनुषंगाने आहे. या मुद्द्यावरच घोडं आडलं आहे. विद्यार्थ्यांनी सीजीएल परीक्षा रद्द करून या कथित घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. पण सरकार त्यावर सहमत नाहीये. एका निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली न्यायालयीन चौकशी करण्यात येईल, असं सरकारचं म्हणणं आहे. तसेच आर्थिक घोटाळा झाल्याचं समोर आल्यावर ईडी मार्फत चौकशी केली जाईल, असं सरकारने म्हटलं आहे. पण या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्याच्या मागणीवर विद्यार्थी अडून आहेत.

Follow Us
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?
जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये...
Tejaswi Ghosalkar | जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी 3 डबे राखीव ठेवण्याची मागणी!
मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद
Mohan Bhagwat | मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद; भारताच्या उज्ज्वल भविष्यावर मांडणार विचार
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र 'या' नेत्याने फिरवली पाठ, नेमकं कारण...
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?
सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं
tv9 Marathi Special Report | सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं? संपूर्ण व्हिडिओ बघाच
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर पुढे काय होणार?