AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

150000 घेऊन जगावेगळं काय शिकवतात? अभिजीत दीपकेंनी खासगी शाळांच्या लुटमारीच्या विरोधात दंड थोपटले

अभिजीत दीपके यांनी खासगी शाळांच्या लुटमारीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. याविरोधात दीपकेंनी आता मोठा अॅक्शन प्लान आखला आहे.

150000 घेऊन जगावेगळं काय शिकवतात? अभिजीत दीपकेंनी खासगी शाळांच्या लुटमारीच्या विरोधात दंड थोपटले
| Updated on: Aug 11, 2026 | 12:49 PM
Share

नीट पेपरफुटीच्या विरोधात आंदोलन यशस्वी झाल्यानंतर आता कॉक्रोच जनता पार्टीने खासगी शाळांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. खासगी शाळांच्या लुटमारीविरोधात अभिजीत दीपके यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आता कॉक्रोच जनता पार्टी ग्रामीण भागातील सरकारी शाळा सुधारल्या पाहिजे, यासाठी दीपकेंनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. यासाठी सरकारला प्रस्ताव देण्यासहित गावकऱ्यांना देखील सोबत घेऊ, असे दीपकेंनी सांगितले.

अभिजीत दीपके यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा भारतीय शिक्षण व्यवस्थेची चिरफाड केली. त्यांनी खासगी शाळेच्या लुटमारीवर टीका केली. अभिजीत दीपके म्हणाले, ‘८० वर्षांत आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ८० वर्ष होतायत. पण ८० वर्षांनंतरही आपल्या देशातल्या शाळा आहेत. त्या खास करून ज्या ग्रामीण भागातल्या शाळा आहेत, अतिशय वाईट परिस्थितीत आहेत. त्यावर कोणीच लक्ष दिलेलं नाही. या देशात म्हणजे आपण पाहिलं की कसे नोटाबंदीनंतर हेडक्वार्टरवर हेडक्वार्टर बांधण्यात आले. आता नवीन संसद भवन बांधण्यात आलं. नवीन पीएम हाउस बांधण्यात आलं. पण शाळांचं काय? जे ग्रामीण भागातले शेतकऱ्यांची मुलं असू द्या, मजुरांची मुलं असू द्या. मजुरांची मुलं असू द्या. काय ते या देशाचं भविष्य नाहीये? काय सरकार यांना त्या मुलांना या देशाचं भविष्य म्हणून बघत नाही का? तो कुठं ना कुठं आम्हाला असं म्हणायचं आहे किंवा आम्हाला असं वाटतं की आता ८० वर्ष होत आले. तर या ८०व्या वर्षाची सुरुवात जी आपण केली पाहिजे, ती ग्रामीण भागातल्या सरकारी शाळांची सुधारणा केली पाहिजे. कारण की त्याच्याशिवाय आपला देश पूर्णपणे विकसित होऊ शकत नाही. कारण की बहुतांश लोक गावाखेड्यात राहतात. तर तुम्ही त्या मुलांना दुर्लक्ष करून या देशाचा विकास करू शकत नाही’.

शाळेच्या लुटमारीवरही दीपकेंनी टीका केली. ‘ फीवर ‘कॅप’ लागला पाहिजे. आमच्या योजनांचा अभ्यास करणारी टीम त्यावर काम करत आहे. खासगी शाळा अवघ्या पहिली-दुसरीच्या शिक्षणासाठी एक ते दीड लाख रुपये घेऊ शकत नाही. दीड लाख घेऊन जगावेगळं काय शिकवतात? पालकांचं उत्पन्न नाहीए. ए.बी. सी.डी शिकवण्याचे एक-दीड लाख रुपये घेतात. खासगी शाळेच्या फीवर ‘कॅप’ लागली पाहिजे. शिक्षणाच्या नावाखाली लुटमार सुरू आहे. शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे. तो व्यवसाय नाही,असेही त्यांनी म्हटले.

‘खासगी शाळा, कोचिंग क्लास चालवणाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे. मध्यमवर्गीय लोकांची लुटमार करू नये. तुम्हाला शिक्षण द्यायचं असेल, धंदा म्हणून देऊ नका. तर विद्या म्हणून द्या. याबाबत सरकारला प्रस्ताव देऊ. आधी गावकऱ्यांना सोबत घेऊ. गावाचा विकास गरजेचा आहे. तरच देशाचा विकास होईल’, असे त्यांनी सांगितले. ‘ग्रामीण भागातील सरकारी शाळा सुधारल्या पाहिजे. तुम्ही त्या विद्यार्थ्यांना दुर्लक्षित करू शकत नाही. १५ तारखेला हिंगोलीच्या संतुक पिंपरी गावात जाणार आहे. गावातील शाळेसाठी काहीतरी करा, असं सरपंचांना सांगणार असल्याचे दीपकेंनी सांगितले.

‘दिल्लीत 20 जून रोजी तारखेला प्रकार घडला होता. तसाच प्रकार झारखंडमध्ये घडलाय. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आलाय. अश्रूधूराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. राजकीय नेते आंदोलन करत असताना अश्रूधूराच्या नळकांड्या का फोडत नाही? हे मला काही समजत नाही. लाठीचार्ज विद्यार्थ्यावरच का होतोय? आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या विद्यार्थी नेते देवेंद्रनाथ महतो यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी ९ दिवस उपोषण केलं. तरीही त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. त्यांना मारहाण झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सरकारने विचार केला पाहिजे. विद्यार्थ्यांवर अत्याचार करून काय मिळणार आहे, विद्यार्थ्या त्यांच्या हक्कासाठी लढत आहे. कोणत्याही व्होटबँकसाठी लढत नाही. त्यांच्यावर लाठीचार्ज झाला नाही पाहिजे, असे त्यांनी पुढे म्हटले.

Follow Us
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?
जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये...
Tejaswi Ghosalkar | जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी 3 डबे राखीव ठेवण्याची मागणी!
मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद
Mohan Bhagwat | मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद; भारताच्या उज्ज्वल भविष्यावर मांडणार विचार
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र 'या' नेत्याने फिरवली पाठ, नेमकं कारण...
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?
सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं
tv9 Marathi Special Report | सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं? संपूर्ण व्हिडिओ बघाच
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर पुढे काय होणार?