AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगे यांच्या ताफ्यातील 2-3 वाहनांचा अपघात, भरगर्दीत…

सांगलीतील विटा शहराकडे येत असताना आंबेगाव जवळ हा अपघात झाला आहे. अपघातात किरकोळ जखमी झालेल्या कार्यकर्त्याला जरांगे स्वत: रुग्णालयात घेऊन गेले आहेत.

मनोज जरांगे यांच्या ताफ्यातील 2-3 वाहनांचा अपघात, भरगर्दीत...
Manoj Jarange PatilImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Aug 11, 2026 | 1:27 PM
Share

आज पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याचा समारोप करत असताना सांगली जिल्ह्यातील विटा येथे मनोज जरांगे यांचे भव्य दिव्य पद्धतीने स्वागत करण्यात आले. या स्वागतासाठी ढोल ताशा झांज पथक आणि 30 जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी करून त्यांचा सन्मान आणि स्वागत करण्यात आले. दरम्यान, प्रचंड गर्दी झाल्यामुळे जरांगे पाटील यांच्या ताफ्यातील दोन ते तीन गाड्या बसल्या धडकल्या. या धडकेत एका कार्यकर्त्याला किरकोळ दुखापत झाली. त्यामुळे सुदैवाने संकट टळलं असे कार्यकर्ते बोलताना दिसत आहेत.

काय घडलं?

सांगलीतील विटा शहराकडे येत असताना आंबेगाव जवळ जरांगे यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाली. त्यामुळे वाहनांना बसचा धक्का लागला आणि हा अपघात घडला. अपघातात किरकोळ जखमी झालेल्या कार्यकर्त्याला मनोज जरांगे पाटील यांनी स्वत: रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. आता अपघातामध्ये जखमी झालेल्या सहकार्याला खासगी रुग्णालयामध्ये हलवलं जात असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सांगली येथे जात असताना त्यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात झाला. त्यापूर्वी येथे माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, सरकार उपसमितीची किती बैठक घेणार अजून, समाजाला काय देताय तुम्ही. मराठा बांधवांनी आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या कुटुंबासाठी ऊर्जा खात्याचा साधा एक जीआर काढता आला नाही सरकारला, काय नाक उचलून फडणवीस बोलणार आहेत. दरवेळी छत्रपतींचे नाव घेताय. जी चूक केली त्याबद्दल बोला, लोकांचा रोष कमी होईल, प्रमाणपत्र द्या पुन्हा. सरकारचा तिरस्कार येतोय आता, तो वाढू देऊ नका, शेतकरी मुस्लिम, ओबीसी मध्ये तिरस्कार. सरकारने मराठा वर्गाला प्रचंड हिणवले आहे. 3 वर्षात किती मोर्चे झाले आणि 3 वर्षात काय दिले. मराठा समाजाचा पुन्हा मुंबईला जाण्याचा देखील विचार आहे.

पुढे ते म्हणाले की, मला अनेक मराठा नेत्यांचे फोन येतात. आमदार, खासदार फोन करून तुम्ही म्हणताय ते पटते असे सांगतात, राणें सारखे अनेक मराठा नेते आता बोलू लागले आहेत, याचे स्वागत आहे. सरकारचा माज उतरवला जातोय. वडेट्टीवार यांना माझ्यावर बोलायला राहुल गांधीनी सांगितले आहे का? बोटावर मोजण्याइतके काँग्रेस राहिली आहे ती ही संपवू नका.

Follow Us
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?
जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये...
Tejaswi Ghosalkar | जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी 3 डबे राखीव ठेवण्याची मागणी!
मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद
Mohan Bhagwat | मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद; भारताच्या उज्ज्वल भविष्यावर मांडणार विचार
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र 'या' नेत्याने फिरवली पाठ, नेमकं कारण...