GK : क्रिकेटमध्ये फक्त तीनच स्टंप का असतात? भले-भले क्रीडाप्रेमी फेल

Cricket : तुमच्यापैकी जवळपास सर्वांना क्रिकेट आवडत असेल. तुम्ही पाहिले असेल की क्रिकेट सामन्यात 3 स्टम्पचा वापर केला जातो. मात्र ही संख्या 2 किंवा 4 का नसते? याचे उत्तर जाणून घेऊयात.

| Updated on: Jan 25, 2026 | 7:47 PM
1 / 5
सुरुवातीचा काळ : क्रिकेटच्या सुरुवातीच्या काळात खेळात फक्त दोनच स्टंप वापरले जात असत आणि त्यांच्यावर एकच बेल (Bail) ठेवली जायची.

सुरुवातीचा काळ : क्रिकेटच्या सुरुवातीच्या काळात खेळात फक्त दोनच स्टंप वापरले जात असत आणि त्यांच्यावर एकच बेल (Bail) ठेवली जायची.

2 / 5

गोलंदाजाची अडचण : दोन स्टंपमध्ये अंतर जास्त असल्याने अनेकदा चेंडू दोन्ही स्टंपच्या मधून निघून जायचा, ज्यामुळे फलंदाज बाद होत नसे आणि गोलंदाजांना विकेट मिळवणे कठीण व्हायचे.

3 / 5

नियमातील अडचण : क्रिकेटच्या नियमानुसार, चेंडू स्टंपला लागल्याशिवाय फलंदाज बाद मानला जात नाही. दोन स्टंपच्या मधून चेंडू गेल्यावर तो स्टंपला स्पर्श करत नसल्याने फलंदाज 'नॉट आऊट' राहायचा.

4 / 5

तिसऱ्या स्टंपची एन्ट्री : गोलंदाजांची ही अडचण दूर करण्यासाठी 1775 च्या सुमारास दोन स्टंपच्या मध्ये तिसरा स्टंप लावण्यास सुरुवात झाली, जेणेकरून मधून जाणारा चेंडू त्याला लागून फलंदाज बाद होईल.

5 / 5

चार स्टंप का नाहीत? : जर स्टंपची संख्या चार केली असती, तर विकेटची रुंदी खूप वाढली असती. अशा स्थितीत फलंदाजाला बाद करणे खूप सोपे झाले असते, म्हणून खेळाच्या दृष्टीने तीन स्टंपची रचना सर्वात योग्य आणि संतुलित मानली जाते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us