
आशिया कप स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. 9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशियाई राष्ट्र क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा पुढील आठवड्यात केली जाणार आहे. 15 सदस्यीय संघात तीन प्रमुख खेळाडूंचा समावेश होणार नसल्याचं जवळपास स्पष्ट आहे. चला जाणून घेऊयात त्याबाबत

आशिया कप संघात अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि शुबमन गिल हे सलामीवीर असतील असे वृत्त आहे. त्यामुळे डावखुरा फलंदाज यशस्वी जयस्वालचा आशिया कपसाठी विचार केला जाणार नाही, हे जवळपास स्पष्ट आहे.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान दुखापत झालेल्या ऋषभ पंतला आशिया कप स्पर्धेत खेळणार नाही हे स्पष्ट आहे.पंतला पूर्ण तंदुरुस्तीसाठी वेळ हवा आहे, त्यामुळे त्याच्या जागी दुसऱ्या यष्टीरक्षकाला संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

भारतीय कसोटी आणि एकदिवसीय संघांचा कायमस्वरूपी सदस्य असलेल्या केएल राहुलचाही आशिया कपसाठी विचार केला जाणार नाही, असे वृत्त आहे. मधल्या फळीत मजबूत फलंदाज देखील आहेत. त्यामुळे आशिया कपसाठी केएल राहुलची निवड होणं कठीण आहे.

ऋषभ पंत दुखापतग्रस्त असल्याने संजू सॅमसन यष्टिरक्षकपदाची जबाबदारी सांभाळेल. ध्रुव जुरेल किंवा जितेश शर्मा यांची दुसऱ्या यष्टिरक्षकपदी निवड होण्याची शक्यता आहे. या आशिया कपमध्ये टीम इंडियासाठी अनेक तरुण फलंदाज मैदानात उतरतील अशी अपेक्षा आहे. (सर्व फोटो टीव्ही 9 नेटवर्क कन्नडवरून)