
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून भारतात खेळली जाणार आहे. भारत या वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपदाचा दावेदार मानला जात आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल. यासाठी टीम इंडियाची घोषणा देखील करण्यात आली आहे. यावेळी पाच जमेच्या बाजू टीम इंडियाच्या बाजूने आहेत.

वनडे वर्ल्डकप स्पर्धा भारतात होणार असल्याने त्याचा फायदा नक्कीच टीम इंडियाला होणार आहे. कारण भारतीय खेळाडूंना खेळपट्ट्या आणि वातावरणाचा चांगला अंदाज आहे. त्यामुळे त्याचा फायदा टीम इंडियाला होईल.

टीम इंडियातील खेळाडूंचा भारतीय मैदानातील सरासरी चांगली आहे. विराट कोहलीने भारतात खेळलेल्या 110 वनडे सामन्यात 57.94 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तर रोहित शर्माने 79 सामन्यात 58.10 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

भारतीय खेळपट्ट्या फिरकीपटूंसाठी अनुकूल आहेत. आशिया व्यतिरिक्त देशातून आलेल्या संघांना फिरकीपटूंचा सामना करणं कठीण जातं. वर्ल्डकपसाठी निवडलेल्या संघात तीन फिरकीपटू आहेत. यात कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांचा समावेश आहे.

भारतीय वेगवान गोलंदाजीचं जसप्रीत बुमराह हे प्रमुख अस्र आहे. दुखापतीनंतर जसप्रीत बुमराह याचं संघात पुनरागमन झालं आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजी आणखी सक्षम झाली आहे.

टीमची बांधणी एकदम परफेक्ट आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. फलंदाजीसाठी विराट-कोहली यांच्यासारखे अनुभवी खेळाडू आहेत. मिडल ऑर्डरमध्ये केएल राहुल, श्रेयस अय्यर आहेत. फिनिशिंगसाठी हार्दिक पांड्या आहेत. तर शार्दुल ठाकुर, जडेजा आणि अक्षर पटेल अष्टपैलू खेळाडू आहेत.