Prashant Kishor: मोठी घडामोड! रणनीतीकार प्रशांत किशोर, सुनेत्रा पवार यांच्या भेटीला, राजकारणात नवा ट्विस्ट?
Prashant Kishor Meets Sunetra Pawar : भाजपला बिहारमध्ये धोबीपछाड दिल्यानंतर जन स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत किशोर हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भे

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचा परंपरागत मतदारसंघ रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी हिसकावला. त्यांनी बांकीपूर विधानसभेत भाजपला अस्मान दाखवले. त्यांच्या विजयाने भाजपला मोठा धक्का बसला. आता प्रशांत किशोर हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीला दाखल झाले आहेत. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यापूर्वी सुद्धा दोन महिन्यांपूर्वी किशोर हे सुनेत्रा पवार यांच्या भेटीला आले होते. त्यावेळी खासदार पार्थ पवार हे सुद्धा उपस्थित होते.
प्रशांत किशोर, सुनेत्रा पवार यांच्या भेटीला
राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार यांच्या भेटीला दाखल झाले. देवगिरी बंगल्यावर प्रशांत किशोर दाखल झाले आहेत. बिहारमधील बांकीपूरमध्ये आता निवडणूक जिंकल्यानंतर ते पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत. पण या भेटीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.पण भेट नेमकी का घेतली जात आहे हे थोड्यावेळात समोर येईल. सध्या किशोर हे पवार यांच्या भेटीला देवगिरी बंगल्यावर पोहचले आहे. निवडणुकीतील विजयानंतर शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ते आले असल्याचे माहिती समोर येत आहे. पार्थ पवार यांची सुद्धा ते भेट घेतील.
मे महिन्यात झाली होती भेट
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि अजितदादा राष्ट्रवादीच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची रणनीतीकार प्रशांत किशोर यांची मे महिन्यात भेट झाली होती. किशोर यांना राजकारणाचीच नाही तर समाजाची सुद्धा चांगली जाण आहे, असे पार्थ पवार म्हणाले होते. त्यावेळी राज्य, देश आणि संघटनेविषयी अनेक विषयावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. अजितदादा आणि प्रशांत किशोर यांची जुने संबंध होते. ते मुंबईत आल्यानंतर त्यांच्याशी चांगला संवाद झाला असे पार्थ पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती.
बांकीपूरमध्ये जोरदार विजय
नितीन नबीन हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. ते बांकीपूर विधानसभा मतदार संघातून निवडून आले होते. त्यांनी राजीनामा दिला होता. या जागेवर पोटनिवडणूक झाली. या ठिकाणी निवडणूक लढवण्याचे शिवधनुष्य जन स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष प्रशांत किशोर यांनी उचलले. बांकीपूर हा भाजपचा गड मानल्या जातो. 1995 पासून हा मतदारसंघ भाजपकडे आहे. तर सलग चार वेळा नबीन हे या मतदारसंघातून विजय झालेले होते. त्यामुळे भाजप सहज विजय होईल असे मानले जात असताना किशोर यांनी येथे सत्ताधाऱ्यांच्या गडाला सुरूंग लावला. बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत ते विजयी झाले.
