IPL 2026: जसप्रीत बुमराहची इतक्या वर्षानंतर निराशाजनक कामगिरी, शेवटच्या सामन्यातून आऊट कारण की..
आयपीएल 2026 स्पर्धा जसप्रीत बुमराहसाठी वाईट स्वप्न होतं. कारण त्याला एक एक विकेट घेण्यासाठी संघर्ष करावा लागला. असं असताना या पर्वातील शेवटच्या सामन्यात खेळत नाही. चला जाणून घेऊयात या पर्वात काय केलं ते..

आयपीएल 2026 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स आऊट झाली आहे. आता औपचारिक शेवटचा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळत आहे. पण संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या सामन्यासाठीच्या अंतिम 11 खेळाडूंमध्ये नव्हता. बुमराहला विश्रांती मिळावी म्हणून मुंबई इंडियन्सने हा निर्णय घेतला. (Photo: IPL/BCCI)

जसप्रीत बुमराहच्या मागच्या 12 वर्षांतील सर्वात वाईट कामगिरी या पर्वात केली. बुमराहसाठी हा हंगाम चांगला गेला नाही.अनुभवी वेगवान गोलंदाज बुमराहने आयपीएल 2013 मध्ये पदार्पण केले होते. पण हे पर्व सर्वात वाईट ठरलं. (Photo: IPL/BCCI)

जसप्रीत बुमराह पहिल्यांदाच 10पेक्षा जास्त सामने खेळून पाच किंवा त्यापेक्षा अधिक गडी बाद करण्यात अपयशी ठरला. या हंगामात बुमराहला 13 सामन्यांमध्ये केवळ चार बळी मिळवता आले. यापूर्वी आयपीएल 2014 मध्ये त्याने 11 सामने खेळून पाच बळी घेतले होते. (Photo: IPL/BCCI)

आयपीएल 2026 स्पर्धेत बुमराहची गोलंदाजीची सरासरी 102.50 होती. त्याच्या संपूर्ण आयपीएल कारकिर्दीतील सर्वात वाईट गोलंदाजी ठरली आहे. यापूर्वी आयपीएल 2015 मध्ये त्याची सरासरी 61.33 होती. तेव्हा फक्त चार सामने खेळला होता आणि त्याने तीन बळी घेतले होते. (Photo: IPL/BCCI)

बुमराहने मुंबई इंडियन्ससाठी 158 सामने खेळले असून 23.74 च्या सरासरीने 187 बळी घेतले आहेत. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीत तीन वेळा चार बळी आणि दोन वेळा पाच बळी घेतले आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट 7.33 आहे. (Photo: IPL/BCCI)