
अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात मुंबई टीमने विदर्भावार मात करत रणजी ट्रॉफी जिंकली. सामन्यानंतर विजेता मुंबई आणि उपविजेत्या विदर्भावर पैशांचा पाऊस पाडण्यात आला. दोन्ही संघांना बक्षिस म्हणून भरगच्च रक्कम मिळाली.

तनुष कोटीयन याने या हंगामात मुंबईसाठी ऑलराउंड कामगिरी केली. तनुषच्या कामगिरीची दखल घेत त्याची प्लेअर ऑफ द सीरिज म्हणून निवड करण्यात आली. तनुषला 2 लाख 50 हजार रुपांयाचा चेक देण्यात आला.

तसेच मुशीर खान याने अंतिम सामन्यात शतकी कामगिरी केली. मुशीर खानला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. मुशीरला 50 हजार रुपयांचा चेक देण्यात आला.

आपला अखेरच्या सामना खेळणाऱ्या धवल कुलकर्णी याचा विशेष सन्मान करण्यात आला. धवलला विशेष स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आलं.

तसेच मुंबईकडून कॅप्टन अजिंक्य रहाणे याने 5 कोटी रुपयांचा धनादेश घेतला. एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनने यावेळेस आणखी 5 कोटी रुपये देण्याची घोषणा केली.

तसेच विदर्भाने जोरदार फाईटबॅक देऊन पलटवार करण्याचा प्रयत्न केला. मात्र विदर्भाला उपविजेते पदावर समाधान मानावं लागलं. विदर्भाला 3 कोटी रुपये देण्यात आले.