
टीम इंडियाने 6 पैकी 5 सामने जिंकून T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये आतापर्यंत दमदार प्रदर्शन केलय. ग्रुप स्टेजजंतर टीम इंडियाने सुपर-8 मध्ये आरामात अफगाणिस्तान आणि बांग्लादेशवर विजय मिळवला. टीम इंडिया सेमीफायनलच्या खूप जवळ आहे.

अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्याने ग्रुप 1 मधील समीकरण रंगतदार बनलय. सगळ्यांची नजर यावर आहे की, ऑस्ट्रेलिया बाहेर होणार की, अफगाणिस्तानचा प्रवास थांबणार. पण दुसरी बाजू अशी सुद्धा आहे की, इतक दमदार प्रदर्शन करुनही टीम इंडिया सुद्धा एका पराभवामुळे सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर होऊ शकते.

टीम इंडियाच हे प्रदर्शन पाहून सेमीफायनलमध्ये जाण्याचा मार्ग कसा रोखला जाऊ शकतो? असा प्रश्न तुम्हाला पडण स्वाभाविक आहे. पण असं होऊ शकतं. ग्रुप-1 मधील शेवटच्या दोन सामन्यांचा निकाल काय लागतो? त्यावर बरच समीकरण अवलंबून आहे.

सोमवारी 24 जूनला टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये सामना आहे. त्यानंतर अफगाणिस्तान आणि बांग्लादेशमध्ये सामना होईल.

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला हरवलं, तर ते सेमीफायनलमध्ये पोहोचतील. ऑस्ट्रेलियाकडून हरल्यानंतरही टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचू शकते. पण एक गोष्ट आहे, क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं.

टीम इंडिया ऑस्ट्रेलियाकडून हरल्यानंतरही सेमीफायनलमध्ये पोहोचू शकते. पण पराभवाच्या अंतरावर सुद्धा बरच काही अवलंबून आहे. कारण सगळा विषय नेट रनरेटवर येऊन अडकतो.

टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाने 40 किंवा त्यापेक्षा जास्त धावांच्या अंतराने हरवलं किंवा 31 पेक्षा जास्त चेंडू राखून हरवलं, तर टीम इंडियाचा रनरेट ऑस्ट्रेलियापेक्षा कमी होईल. अशा स्थितीत ऑस्ट्रेलिया आणि भारताचे 4-4 पॉइंट होतील. दोन्ही टीम्स पहिल्या-दुसऱ्या नंबरवर असतील.

त्यानंतर अफगाणिस्तान-बांग्लादेश सामन्यावर नजर असेल. या सामन्यातही जय-पराजयात धावांच अंतर महत्त्वाच असेल.

अफगाणिस्तानची टीम फॉर्ममध्ये आहे, त्यांनी बांग्लादेशला 80 किंवा त्यापेक्षा जास्त धावांच्या फरकाने हरवलं, तर अफगाणिस्तानचा रनरेट भारतापेक्षा जास्त होईल.

अशी स्थितीत अफगाणिस्तान, भारत आणि ऑस्ट्रेलिया तिघांचे प्रत्येकी 4-4 पॉइंट होतील. नेट रनरेटच्या आधारावर अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया पहिल्या-दुसऱ्या नंबरवर राहतील. दोन्ही टीम्स सेमीफायनलमध्ये पोहोचतील. टीम इंडियाच आव्हान संपुष्टात येईल.