IND A vs SL A: ऋतुराज गायकवाडने संधीचं केलं सोनं, शेवटच्या क्षणात संघात आला आणि ठोकलं शतक

Ruturaj Gaikwad century: भारत अ संघ श्रीलंकेत तिरंगी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना श्रीलंकेविरुद्ध होत आहे. या सामन्यातील पहिल्याच सामन्यात ऋतुराज गायकवाडने कमाल केली. त्याने 112 चेंडूत शतक पूर्ण केलं.

| Updated on: Jun 09, 2026 | 2:47 PM
1 / 5
भारत अ, श्रीलंका अ आणि अफगाणिस्तान अ यांच्यात तिरंगी मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यात रंगला आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करून 50 षटकात 6 गडी गमवून 277 धावा केल्या. यात ऋतुराज गायकवाडने शतक ठोकलं. ऋतुराज गायकवाडने 100व्या सामन्यात हे शतक ठोकलं. (Photo: PTI)

भारत अ, श्रीलंका अ आणि अफगाणिस्तान अ यांच्यात तिरंगी मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यात रंगला आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करून 50 षटकात 6 गडी गमवून 277 धावा केल्या. यात ऋतुराज गायकवाडने शतक ठोकलं. ऋतुराज गायकवाडने 100व्या सामन्यात हे शतक ठोकलं. (Photo: PTI)

2 / 5
ऋतुराज गायकवाडने श्रीलंका अ विरूद्धच्या सामन्यात 112 चेंडूत शतक पूर्ण केलं. त्याचं लिस्ट ए क्रिकेट कारकिर्दीतील हे 21वं शतक आहे. त्यात त्याने 6 चौकार आणि 3 षटकार मारले. 114 चेंडूत 101 धावा करून बाद झाला. (Photo: PTI)

ऋतुराज गायकवाडने श्रीलंका अ विरूद्धच्या सामन्यात 112 चेंडूत शतक पूर्ण केलं. त्याचं लिस्ट ए क्रिकेट कारकिर्दीतील हे 21वं शतक आहे. त्यात त्याने 6 चौकार आणि 3 षटकार मारले. 114 चेंडूत 101 धावा करून बाद झाला. (Photo: PTI)

3 / 5
श्रीलंकेत सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत खरं तर ऋतुराज गायकवाडचं नाव नव्हतं. त्याला या संघात नशिबाने स्थान मिळालं आहे. कारण रियान परागच्या जागी त्याला संघात संधी मिळाली. रियान पराग हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे संघातून बाहेर आहे. त्यामुळे त्याला ही संधी मिळाली. (Photo: PTI)

श्रीलंकेत सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत खरं तर ऋतुराज गायकवाडचं नाव नव्हतं. त्याला या संघात नशिबाने स्थान मिळालं आहे. कारण रियान परागच्या जागी त्याला संघात संधी मिळाली. रियान पराग हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे संघातून बाहेर आहे. त्यामुळे त्याला ही संधी मिळाली. (Photo: PTI)

4 / 5
ऋतुराज गायकवाडने या संधीचं सोनं केलं. भारताच्या या सामन्यात 16 धावांवर 2 विकेट पडल्या होत्या. त्यामुळे अशा स्थितीत टीम इंडियाचं सावरणं गरजेचं होतं. त्यावेळी ऋतुराज गायकवाडने खेळपट्टीवर पाय रोवले आणि संघाला संकटातून बाहेर काढलं. (Photo: PTI)

ऋतुराज गायकवाडने या संधीचं सोनं केलं. भारताच्या या सामन्यात 16 धावांवर 2 विकेट पडल्या होत्या. त्यामुळे अशा स्थितीत टीम इंडियाचं सावरणं गरजेचं होतं. त्यावेळी ऋतुराज गायकवाडने खेळपट्टीवर पाय रोवले आणि संघाला संकटातून बाहेर काढलं. (Photo: PTI)

5 / 5
ऋतुराज गायकवाडने शतकी खेळीदरम्यान भारत अ संघाचा कर्णधार तिलक वर्मासोबत चौथ्या विकेटासीट 150 धावांची भागीदारी केली. यामुळे टीम इंडियाला 250 पार धावा करण्यास मदत झाली. तिलक वर्माने 97 चेंडूत 60 धावांची खेळी केली. (Photo: PTI)

ऋतुराज गायकवाडने शतकी खेळीदरम्यान भारत अ संघाचा कर्णधार तिलक वर्मासोबत चौथ्या विकेटासीट 150 धावांची भागीदारी केली. यामुळे टीम इंडियाला 250 पार धावा करण्यास मदत झाली. तिलक वर्माने 97 चेंडूत 60 धावांची खेळी केली. (Photo: PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us