
यशस्वी जयस्वाल याने या मालिकेतील 9 डावांमध्ये 700 पेक्षा अधिक धावा केल्या. यशस्वी टीम इंडियासाठी एका कसोटी मालिकेत 700 पेक्षा अधिक धावा करणारा टीम इंडियाचा दुसरा फलंदाज ठरला. हा विक्रम अजूनही लिटील मास्टर सुनील गावस्कर यांच्या नावावर आहे.

आर अश्विन याचा धर्मशालेतील पाचवा सामना त्याच्या कारकीर्दीतील 100 वा सामना होता. अश्विनने धर्मशालेतील पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत 5 विकेट्स घेतल्या. अश्विनचा यासह 100 व्या कसोटीत 5 विकेट्स घेणाऱ्या दिग्गजांच्या यादीत समावेश झाला. अश्विनआधी असा कारनामा मुथय्या मुरलीधरन, शेन वॉर्न आणि अनिल कुंबळे या तिघांनी केला होता.

तसेच आर अश्विन याने अनिल कुंबळेचा टीम इंडियासाठी कसोटीत सर्वाधिक 35 वेळा 5 विकेट्स घेण्याचा विक्रम मोडीत काढला. अश्विनची ही 5 विकेट्स घेण्याची 36 वी वेळ ठरली.

यशस्वीने धर्मशालेत पहिल्या डावात 57 धावा करत विराट कोहली याचा रेकॉर्ड ब्रेक केला. जयस्वाल इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला. त्याआधी विराटने इंग्लंड विरुद्ध 2016-2017 मध्ये 655 धावा केल्या होत्या.

कॅप्टन रोहित शर्मा याने पाचव्या कसोटी सामन्यात ख्रिस गेल याचा रेकॉर्ड उध्वस्त केला. रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ओपनर म्हणून 43 वं शतक करत ख्रिस गेलला पछाडलं. गेलने ओपनर म्हणून आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये 42 शतकं केली होती.

आर अश्विन याने या मालिकेत कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट्सचा टप्पा पार केला. आर अश्विन कसोटीत 500 विकेट्स घेणारा अनिल कुंबेळनंतर दुसरा भारतीय ठरला.