गौरव खन्ना-आकांक्षानंतर आता आणखी एक जोडप्याचा घटस्फोट; साखरपुड्यानंतर सात वर्षांनी केलं लग्न अन् आता 5 वर्षांचा संसार मोडला
'गुम है किसीके प्यार' या मालिकेतील लोकप्रिय झालेली अभिनेत्री आता लग्नाच्या पाच वर्षानंतर घटस्फोट घेत असल्याची माहिती दिली आहे, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.

tanvi thakkar divorce
- तन्वी ठक्कर आणि आदित्य कपाडिया ही एक लोकप्रिय टीव्ही जोडी आहे. ते अनेकदा सोशल मीडियावर ‘कपल-गोल’ पोस्ट शेअर करतात, पण गेल्या काही काळापासून त्यांच्या नात्यात काहीतरी बिनसल्याच्या बातम्यांनी सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू होती. ते आता एकत्र नाहीत आणि लवकरच वेगळे होऊ शकतात, अशा अटकळी लावल्या जात होत्या.
- अभिनेत्री तन्वी ठक्करने तिच्या घटस्फोटाची घोषणा करून या वृत्तांना दुजोरा दिला आहे. ‘गुम है किसीके प्यार में’ सारख्या लोकप्रिय मालिकांमुळे घराघरात पोहोचलेल्या तन्वी ठक्करने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची ही धक्कादायक माहिती सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
- तन्वी ठक्करने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरील एका भावनिक पोस्टद्वारे तिच्या घटस्फोटाला दुजोरा दिला. तिने सांगितले की, लग्नाच्या पाच वर्षांहून अधिक काळानंतर, तिने आणि तिचा पती आदित्य कपाडिया यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. (फोटो सौजन्य: इंस्टाग्राम tanvithakker)
- ती म्हणते की, त्यांनी हा निर्णय अचानक घेतला नाही. ते बऱ्याच काळापासून विभक्त होण्याच्या निर्णयावर विचार करत होते. खूप विचारविनिमय केल्यानंतर त्यांनी हे पाऊल उचलले. तिने स्पष्ट केले की, हा काळ त्या दोघांसाठी मानसिकदृष्ट्या अत्यंत कठीण आणि संवेदनशील होता. एकमेकांबद्दल आणि त्यांच्या कुटुंबांबद्दल प्रेम, आदर आणि सामंजस्य टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला.
- आपल्या भावनिक पोस्टमध्ये अभिनेत्रीने लिहिले, “गेल्या काही महिन्यांपासून लोक मला माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारत आहेत. खूप विचारविनिमय केल्यानंतर, मी आणि आदित्यने वेगळे होण्याचा आणि आपापल्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा आमच्या दोघांसाठीही एक भावनिक क्षण होता. आमच्यात कोणताही कटुता किंवा वाद नाही. आम्ही दोघांनी प्रेम आणि आदराने पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. या वेळी, मी सर्वांना विनंती करते की आम्हाला एकांत द्यावा.”
- यांची लव्हस्टोरी ही ‘एक दुसरे से करते हैं प्यार हम’ या टीव्ही शोच्या सेटवर सुरू झाली. यानंतर तन्वी आणि आदित्य यांनी 16 फेब्रुवारी 2021 रोजी लग्न केले. लग्नानंतर दोन वर्षांनी या जोडप्याला पहिले बाळ झाले आणि आता, पालक बनल्यानंतर तीन वर्षांनी, त्यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. तन्वी ठक्करला ‘गूम हैं किसी के प्यार किया’ या मालिकेतून ओळख मिळाली, तर आदित्य कपाडिया ‘शकला का बम बम’ या मालिकेतून बालकलाकार म्हणून लोकप्रिय झाला.
Follow Us