India vs Afghanistan T20 : वैभव घरेलू मैदान गाजवणार त्याआधीच आली वाईट बातमी, चाहत्यांची निराशा होणार?
वैभव सूर्यवंशीच्या आक्रमक फलंदाजीने परदेशी दौऱ्यांनी चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. आता घरच्या मैदानावर त्याला खेळताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. मात्र पहिल्याच सामन्यापूर्वी दिल्लीतून मोठी अपडेट समोर आली आहे.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 3 टी20 सामन्यांच्या मालिकेला 13 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
15 वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीने परदेशी दौऱ्यांवर आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. जर त्याला प्लेइंग 11 खेळाडूंमध्ये स्थान मिळाले, तर भारतीय भूमीवर त्याची ही पहिली आंतरराष्ट्रीय टी20 मालिका ठरणार आहे.
दरम्यान, दिल्लीत रविवारी ढगाळ वातावरण राहण्याची आणि पावसाच्या हलक्या ते जोरदार सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सामन्याच्या वेळेस म्हणजे संध्याकाळी पावसाचा धोका अधिक असल्याने सामन्यात व्यत्यय येऊ शकतो.
इंग्लंड आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या टी20 सामन्यांमध्ये वैभवने 189 हून अधिकच्या स्ट्राइक रेटने 193 धावा केल्या आहेत. या उत्तम कामगिरीमुळे भारतीय चाहते त्याला घरच्या मैदानावर खेळताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
टी20 क्रिकेटमध्ये भारत आणि अफगाणिस्तान आतापर्यंत 9 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये भारतीय संघाने नेहमीच वर्चस्व राखले असून अफगाणिस्तानचा संघ या मालिकेत आपला रेकॉर्ड सुधारण्याच्या दृष्टीने मैदानात उतरेल.