Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीच्या सिलेक्शनमुळे नवीन T20 कॅप्टन श्रेयस अय्यर समोर निर्माण झाला मोठा प्रश्न
Vaibhav Sooryavanshi : भारतीय क्रिकेटमधील उदयोन्मुख स्टार खेळाडू वैभव सूर्यवंशीला अखेर टीम इंडियात स्थान मिळालं आहे. त्याचवेळी सूर्यकुमार यादवला भारतीय T20 क्रिकेट संघाच्या कर्णधार पदावरुन हटवलं आहे. त्याच्याजागी श्रेयस अय्यरची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

आयर्लंड आणि इंग्लंड विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी 16 सदस्यीय संघ जाहीर झाला आहे. दोन्ही संघांविरुद्ध टीम इंडियाच्या त्याच 16 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव दोघेही मुंबईचे खेळाडू आहेत. एका मुंबईकराला हटवून दुसऱ्या मुंबईकराला संधी मिळाली आहे. (Getty Images)

यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये वैभव सूर्यवंशीने 700 पेक्षा जास्त धावा फटकावल्या. त्याने भल्या-भल्या बॉलर्सची गोलंदाजी फोडून काढली. जसप्रीत बुमराह, हेझलवूड कुठल्याही बॉलरला ठेवलं नाही. अगदी पहिल्या चेंडूपासून षटकार ठोकले. (Getty Images)

त्यामुळे सचिन तेंडुलकरपासून अनेक दिग्गज खेळाडूंची इच्छा होती की, वैभव सूर्यवंशीला टीम इंडियाकडून संधी मिळाली पाहिजे. वैभव आता अवघ्या 15 वर्षांचा आहे. आयपीएलचा, अंडर 19 क्रिकेटचा अनुभव त्याच्या गाठिशी आहे. फलंदाजी करताना त्याचं टॅलेंट दिसून येतं. (Getty Images)

वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात झालेली निवड चांगली बाब आहे. पण या निवडीमुळे नवीन कॅप्टन श्रेयस अय्यरसमोर काही प्रश्न निर्माण होणार आहेत. त्यावर गौतम गंभीर आणि श्रेयस अय्यर यांनाच उत्तर शोधावं लागेल. वैभव सूर्यवंशी ओपनिंग करतो. सध्या टीम इंडियात अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि ईशान किशन असे तीन ओपनर आहेत. तिघेही चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. मग वैभवला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेतल तर ओपनिंगच्या पोजिशनवरुन कोणाला हटवणार? हा प्रश्न आहे. त्याशिवाय संघातून एकाला वगळावं लागेल. सूर्याच्या जागी श्रेयस आलाय. वैभवसाठी एक फलंदाज कमी करणार की, गोलंदाज?. (Getty Images)

टी 20i सीरिजसाठी टीम इंडिया : श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, ईशान किशन, शिवम दुबे, नितीश रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, प्रिंस यादव, हर्षित राणा, रवी बिश्नोई आणि वैभव सूर्यवंशी. (Getty Images)