
बॉलिवूड चित्रपटांमध्ये आजच्या काळात इंटिमेट सीन दाखवणे सामान्य झाले आहे. अनेकदा कथानकाच्या गरजेनुसार अशा दृश्यांचा समावेश केला जातो. मात्र काही वेळा कलाकारांना असे सीन साकारताना अस्वस्थ वाटू शकते. अशा वेळी कलाकार आणि दिग्दर्शक यांच्यात मतभेद निर्माण होण्याची शक्यता असते.

एकदा असाच प्रसंग अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या बाबतीत घडल्याची चर्चा आहे. माधुरी दीक्षित आणि अमिताभ बच्चन हे ‘शनाख्त’ या चित्रपटात एकत्र काम करणार होते. मात्र चित्रपटाच्या शूटिंगच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या एका घटनेमुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते.

टिन्नू आनंद यांनी एका मुलाखतीत या चित्रपटाशी संबंधित आठवणी सांगितल्या होत्या. त्यांच्या मते, चित्रपटातील एका सीनमध्ये अमिताभ बच्चन यांचे पात्र साखळदंडाने बांधलेले असते आणि काही गुंड त्यांच्यावर हल्ला करत असतात. त्या वेळी माधुरीचे पात्र समोर येऊन त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते असा सीन आहे.

दिग्दर्शकांच्या म्हणण्यानुसार, या सीनमध्ये माधुरीच्या पात्राने स्वतःचा त्याग दर्शवण्यासाठी काही ठळक सीन करायची होती. चित्रपट साइन करतानाच या सीनबाबत चर्चा झाली होती असे त्यांनी सांगितले. सुरुवातीला माधुरीने ते मान्य केल्याचेही त्यांनी नमूद केले.

मात्र प्रत्यक्ष शूटिंगच्या वेळी माधुरी दीक्षितने तो सीन साकारण्यास नकार दिला. यामुळे सेटवर तणाव निर्माण झाला. टिन्नू आनंद यांनी शूटिंग थांबवण्याचा निर्णय घेतल्याचेही सांगितले जाते. या प्रसंगी अमिताभ बच्चन यांनी मध्यस्थी करत परिस्थिती शांत केली अशी माहिती मुलाखतीत देण्यात आली होती.