S Jaishankar : ऐन युद्धात स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये भारताच्या बाजूने सगळा गेम फिरवणारे एस जयशंकर कोण?

S Jaishankar : पश्चिम आशियात मोठा संघर्ष सुरु आहे. इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्ध सुरु आहे. या दरम्यान भारतासाठी एक चांगली बातमी आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची इराणचे परराष्ट्र मंत्री सैयद अब्बास अराघची यांच्याशी टेलिफोनवर चर्चा झाली. त्यानंतर इराणने भारताच्या तेल टँकर्सना स्ट्रेट ऑफ होर्मुज पार करण्याची परवानगी दिली आहे. भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची घडामोड आहे. कारण स्ट्रेट ऑफ होर्मुज जगातील महत्वाच्या सागरी मार्गांपैकी एक आहे. जागतिक तेल आणि नैसर्गिक गॅसची मोठी वाहतूक या जलमार्गावरुन होते.

| Updated on: Mar 12, 2026 | 12:31 PM
1 / 5
इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून एकही जहाज जाऊ देणार नाही अशी धमकी दिली आहे. तिथे काही तेल टँकर्सवर हल्ले झाले आहेत. पण इराणने भारताला मात्र सवलत दिली आहे. हे सर्व शक्य झालय, ते भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या कूटनितीमुळे. जयशंकर यांच्याकडे भारताच्या परराष्ट्र सेवेचा दीर्घ अनुभव आहे.

इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून एकही जहाज जाऊ देणार नाही अशी धमकी दिली आहे. तिथे काही तेल टँकर्सवर हल्ले झाले आहेत. पण इराणने भारताला मात्र सवलत दिली आहे. हे सर्व शक्य झालय, ते भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या कूटनितीमुळे. जयशंकर यांच्याकडे भारताच्या परराष्ट्र सेवेचा दीर्घ अनुभव आहे.

2 / 5
जयशंकर यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाला आकार देण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांचा जन्म दिल्लीत झाला. त्यांच्या आईचं नाव सुलोचना सुब्रमण्यम. त्यांचे वडिल कृष्णस्वामी सुब्रमण्यम प्रसिद्धी आंतरराष्ट्रीय विषयाचे विश्लेषक, पत्रकार आणि माजी भारतीय सेवेतील अधिकारी होते.

जयशंकर यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाला आकार देण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांचा जन्म दिल्लीत झाला. त्यांच्या आईचं नाव सुलोचना सुब्रमण्यम. त्यांचे वडिल कृष्णस्वामी सुब्रमण्यम प्रसिद्धी आंतरराष्ट्रीय विषयाचे विश्लेषक, पत्रकार आणि माजी भारतीय सेवेतील अधिकारी होते.

3 / 5
 एस जयशंकर यांनी आपलं शालेय शिक्षण दिल्ली एअर फोर्स स्कूल आणि बंगळुरु मिलिट्री स्कूलमधून पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून रसायन विज्ञानाच पदवी मिळवली. जयशंकर यांनी जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातून (जेएनयू) राजकीय विज्ञानात एम ए आणि आंतरराष्ट्रीय संबंध एम.फिल आणि पीएचडी केली. त्यांना अणू कुटनितीमध्ये तज्ज्ञ मानले जातात.

एस जयशंकर यांनी आपलं शालेय शिक्षण दिल्ली एअर फोर्स स्कूल आणि बंगळुरु मिलिट्री स्कूलमधून पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून रसायन विज्ञानाच पदवी मिळवली. जयशंकर यांनी जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातून (जेएनयू) राजकीय विज्ञानात एम ए आणि आंतरराष्ट्रीय संबंध एम.फिल आणि पीएचडी केली. त्यांना अणू कुटनितीमध्ये तज्ज्ञ मानले जातात.

4 / 5
जयशंकर 1977 साली भारतीय परराष्ट्र सेवेत आले. त्यांनी 1979 ते 1981 दरम्यान मॉस्कोत सोवियत संघाच्या भारतीय मिशनमध्ये तिसरे सचिव आणि दुसरे सचिव म्हणून काम केलं. ते सिंगापूरमध्ये भारताचे उच्चायुक्त होते. चेक गणराज्य, चीन आणि अमेरिकेत राजदूत म्हणून काम केलय. 29 जानेवारी 2015 रोजी त्यांची भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती झाली.

जयशंकर 1977 साली भारतीय परराष्ट्र सेवेत आले. त्यांनी 1979 ते 1981 दरम्यान मॉस्कोत सोवियत संघाच्या भारतीय मिशनमध्ये तिसरे सचिव आणि दुसरे सचिव म्हणून काम केलं. ते सिंगापूरमध्ये भारताचे उच्चायुक्त होते. चेक गणराज्य, चीन आणि अमेरिकेत राजदूत म्हणून काम केलय. 29 जानेवारी 2015 रोजी त्यांची भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती झाली.

5 / 5
30 मे 2019 रोजी जयशंकर यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. 31 मे 2019 रोजी त्यांची परराष्ट्र मंत्री पदावर नियुक्ती करण्यात आली. भारतीय कूटनितीमधील योगदानासाठी त्यांना 2019 साली भारत सरकारने पद्म श्री पुरस्काराने सन्मानित केलं. हा चौथा सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे.

30 मे 2019 रोजी जयशंकर यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. 31 मे 2019 रोजी त्यांची परराष्ट्र मंत्री पदावर नियुक्ती करण्यात आली. भारतीय कूटनितीमधील योगदानासाठी त्यांना 2019 साली भारत सरकारने पद्म श्री पुरस्काराने सन्मानित केलं. हा चौथा सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे.

Follow Us