
भारतात विवाह हा त्या-त्या घरासाठी एक मोठा उत्सव असतो. विवाह हा फक्त दोघांमध्ये होत असला तरी विवाह सोहळ्यात मात्र शेकडो लोकांचा समावेश असतो. म्हणूनच विवाहाआधी आणि विवाहानंतर वेगवेगळ्या पूजा, विधी केले जातात.

लग्नाच्या अगोदर हळद लावली जाते. ज्यांचे लग्न होणार आहे, त्यांच्या अंगाला हळद लावली जाते. या उत्सवाला फार महत्त्व असते. म्हणूनच या हळद लावण्याचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो

अनेकजण हळद लावण्याच्या उत्साहात आनंदाने सहभागी होतात. पण अनेकांना नवरी-नवरदेवाच्या अंगाला हळद का लावली जाते, याचीच कल्पना नसते. ज्योतिषशास्त्रानुसार गुरू ग्रहाची कृपा राहावी यासाठी नवरी-नवरदेवाच्या अंगाला हळद लावली जाते.

गुरू ग्रहाची कृपादृष्टी असणे हे लग्न सोहळ्यासाठी खूप महत्त्वाचे असते. असे मानले जाते. तसे नसेल तर लग्नात अडचणी येऊ शकतात, म्हणूनच गुरु ग्राहाला प्रसन्न करण्यासाठी हळदी समारंभ पार पाडला, जातो असे म्हटले जाते.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.