


वेळ हे सर्वांत मोठं धन असतं. वेळेचा अपमान किंवा दुरुपयोग करणं अत्यंत चुकीचं असतं. वेळ आणि धन या दोन्ही गोष्टी अमूल्य आहेत, असं आचार्य चाणक्य यांचं मत होतं. त्यामुळे जी व्यक्ती वेळेचा आदर करते, ती यशस्वी ठरते.

चुकीच्या लोकांच्या संगतीने धन आणि सन्मान या दोन्ही गोष्टी नष्ट होतात. त्यामुळे दारूचं व्यसन करणाऱ्या आणि फुकट खर्च करणाऱ्या लोकांपासून नेहमीच दूर राहिलं पाहिजे.

दैनंदिन जीवनातील छोट्या-मोठ्या खर्चाचा हिशोब ठेवायला हवा. यातून बचन करण्यास मदत होते. त्याचप्रमाणे योग्य वेळी घेतलेला विचारपूर्वक निर्णय हा यश मिळवण्याचा सर्वांत महत्त्वाचा मार्ग असल्याचंही चाणक्य यांनी सांगितलं आहे.

जी व्यक्ती कमाईच्या एकाच स्रोतावर अवलंबून असते, ती संकटकाळी सर्वांत आधी खाली घसरते. त्यामुळे कमाईचे विविध स्रोत निर्माण करावेत आणि त्यासाठी नवीन कौशल्ये शिकावीत, असा सल्ला त्यांनी दिला होता.