राजस्थानमध्ये 28 वर्षांपासूनची परंपरा यावेळीही कायम

मुंबई : मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान ही राज्य भाजपच्या हातून गेल्यात जमा आहेत. सुरुवातीच्या कलांनुसार, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल केली आहे. मध्य प्रदेशमध्ये अटीतटीची लढत सुरु आहे. पण इथे अपक्ष आणि छोट्या पक्षांची निर्णायक भूमिका असेल. राहुल गांधींना काँग्रेस अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारुन आज बरोबर एक वर्ष झालंय, नेमकं याच दिवशी […]

राजस्थानमध्ये 28 वर्षांपासूनची परंपरा यावेळीही कायम
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

मुंबई : मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान ही राज्य भाजपच्या हातून गेल्यात जमा आहेत. सुरुवातीच्या कलांनुसार, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल केली आहे. मध्य प्रदेशमध्ये अटीतटीची लढत सुरु आहे. पण इथे अपक्ष आणि छोट्या पक्षांची निर्णायक भूमिका असेल. राहुल गांधींना काँग्रेस अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारुन आज बरोबर एक वर्ष झालंय, नेमकं याच दिवशी काँग्रेसने त्यांना भेट म्हणून दोन राज्यातली सत्ता दिली आहे. याशिवाय राजस्थानमध्ये गेल्या 28 वर्षांची परंपरा या निवडणुकीतही कायम राहिली.

राजस्थानच्या या 28 वर्षांच्या परंपरेची सुरुवात होते ती 1990 पासून. भैरोसिंग शेखावत हे पहिलेच बिगर काँग्रेस मुख्यमंत्री बनले. या पदावर ते 1992 पर्यंत राहिले आणि नंतर राष्ट्रपती राजवट लागली. पुन्हा 4 नोव्हेंबर 1993 ला शेखावत मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. ते 29 नोव्हेंबर 1998 पर्यंत मुख्यमंत्री होते.

निवडणूक आली आणि पुन्हा एकदा राजस्थानमधील सत्तांतर झालं. 1 डिसेंबर 1998 रोजी काँग्रेसचे नेते अशोक गहलोत यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 8 डिसेंबर 2003 पर्यंत अशोक गहलोत मुख्यमंत्री होते. राजस्थानमधील सत्तांतराचा ट्रेंड कायम राहिला आणि 2003 ला पुन्हा भाजपचं सरकार आलं. वसुंधरा राजे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

पाच वर्षात पुन्हा एकदा भाजपचा पराभव झाला आणि काँग्रेस सत्तेत आली. अशोक गहलोत यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 2013 ला यूपीए सरकारविरोधातील रोष वाढला होता आणि मोदी लाट सुरु झाली होती. या वेळीच पुन्हा एकदा राजस्थानमध्ये सत्तांतर झालं आणि वसुंधरा राजे मुख्यमंत्री झाल्या.

2018 च्या निवडणुकीत राजस्थानच्या जनतेने पुन्हा एकदा काँग्रेसला संधी आहे. अशोक गहलोत आणि सचिन पायलट हे दोघे काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात. वसुंधरा राजेंनी सत्ता गमावली आहे. त्यामुळे राजस्थानमधील सत्ताबदलाची ही परंपरा 28 वर्षांपासून कायम आहे.

राजस्थानमध्ये सर्वाधिक काळ काँग्रेसची सत्ता

राजस्थानमध्ये स्वातंत्र्यानंतर 1951 ते 1990 या 40 वर्षांच्या काळात तीन वर्ष वगळले तर फक्त काँग्रेसची सत्ता होती. 22 जून 1977 ला भैरोसिंग शेखावत यांचं जनता दल सरकार सत्तेत आलं, पण हे सरकार तीन वर्षांच्या आतच बरखास्त झालं आणि राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यानंतर 1980 मध्ये जगन्नाथ पहाडिया हे काँग्रेसचे नवे मुख्यमंत्री झाले आणि सलग दहा वर्ष काँग्रेसचीच सत्ता राहिली.

काँग्रेसच्या राजकारणातील आणखी एक घडामोड म्हणजे ज्या-ज्या वेळी बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री झाला, त्यानंतर काही वर्षातच राष्ट्रपती राजवट लागू झालेली पाहायला मिळते. 1992 सालीही भैरोसिंग शेखावत मुख्यमंत्री असताना हाच प्रकार घडला होता. यानंतर नव्याने निवडणूक लागली आणि काँग्रेसची सत्ता आली.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.