AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजस्थानमध्ये 28 वर्षांपासूनची परंपरा यावेळीही कायम

मुंबई : मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान ही राज्य भाजपच्या हातून गेल्यात जमा आहेत. सुरुवातीच्या कलांनुसार, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल केली आहे. मध्य प्रदेशमध्ये अटीतटीची लढत सुरु आहे. पण इथे अपक्ष आणि छोट्या पक्षांची निर्णायक भूमिका असेल. राहुल गांधींना काँग्रेस अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारुन आज बरोबर एक वर्ष झालंय, नेमकं याच दिवशी […]

राजस्थानमध्ये 28 वर्षांपासूनची परंपरा यावेळीही कायम
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM
Share

मुंबई : मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान ही राज्य भाजपच्या हातून गेल्यात जमा आहेत. सुरुवातीच्या कलांनुसार, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल केली आहे. मध्य प्रदेशमध्ये अटीतटीची लढत सुरु आहे. पण इथे अपक्ष आणि छोट्या पक्षांची निर्णायक भूमिका असेल. राहुल गांधींना काँग्रेस अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारुन आज बरोबर एक वर्ष झालंय, नेमकं याच दिवशी काँग्रेसने त्यांना भेट म्हणून दोन राज्यातली सत्ता दिली आहे. याशिवाय राजस्थानमध्ये गेल्या 28 वर्षांची परंपरा या निवडणुकीतही कायम राहिली.

राजस्थानच्या या 28 वर्षांच्या परंपरेची सुरुवात होते ती 1990 पासून. भैरोसिंग शेखावत हे पहिलेच बिगर काँग्रेस मुख्यमंत्री बनले. या पदावर ते 1992 पर्यंत राहिले आणि नंतर राष्ट्रपती राजवट लागली. पुन्हा 4 नोव्हेंबर 1993 ला शेखावत मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. ते 29 नोव्हेंबर 1998 पर्यंत मुख्यमंत्री होते.

निवडणूक आली आणि पुन्हा एकदा राजस्थानमधील सत्तांतर झालं. 1 डिसेंबर 1998 रोजी काँग्रेसचे नेते अशोक गहलोत यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 8 डिसेंबर 2003 पर्यंत अशोक गहलोत मुख्यमंत्री होते. राजस्थानमधील सत्तांतराचा ट्रेंड कायम राहिला आणि 2003 ला पुन्हा भाजपचं सरकार आलं. वसुंधरा राजे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

पाच वर्षात पुन्हा एकदा भाजपचा पराभव झाला आणि काँग्रेस सत्तेत आली. अशोक गहलोत यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 2013 ला यूपीए सरकारविरोधातील रोष वाढला होता आणि मोदी लाट सुरु झाली होती. या वेळीच पुन्हा एकदा राजस्थानमध्ये सत्तांतर झालं आणि वसुंधरा राजे मुख्यमंत्री झाल्या.

2018 च्या निवडणुकीत राजस्थानच्या जनतेने पुन्हा एकदा काँग्रेसला संधी आहे. अशोक गहलोत आणि सचिन पायलट हे दोघे काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात. वसुंधरा राजेंनी सत्ता गमावली आहे. त्यामुळे राजस्थानमधील सत्ताबदलाची ही परंपरा 28 वर्षांपासून कायम आहे.

राजस्थानमध्ये सर्वाधिक काळ काँग्रेसची सत्ता

राजस्थानमध्ये स्वातंत्र्यानंतर 1951 ते 1990 या 40 वर्षांच्या काळात तीन वर्ष वगळले तर फक्त काँग्रेसची सत्ता होती. 22 जून 1977 ला भैरोसिंग शेखावत यांचं जनता दल सरकार सत्तेत आलं, पण हे सरकार तीन वर्षांच्या आतच बरखास्त झालं आणि राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यानंतर 1980 मध्ये जगन्नाथ पहाडिया हे काँग्रेसचे नवे मुख्यमंत्री झाले आणि सलग दहा वर्ष काँग्रेसचीच सत्ता राहिली.

काँग्रेसच्या राजकारणातील आणखी एक घडामोड म्हणजे ज्या-ज्या वेळी बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री झाला, त्यानंतर काही वर्षातच राष्ट्रपती राजवट लागू झालेली पाहायला मिळते. 1992 सालीही भैरोसिंग शेखावत मुख्यमंत्री असताना हाच प्रकार घडला होता. यानंतर नव्याने निवडणूक लागली आणि काँग्रेसची सत्ता आली.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.