AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक-दोन नव्हे, मोदींचे तब्बल 36 मंत्री जम्मू काश्मीर दौऱ्यावर, कारण काय?

जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 रद्द करुन आता जवळपास पाच महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. एकीकडे सरकार दावा करत आहे की जम्मू काश्मीरमध्ये सर्वकाही सुरळीत आहे.

एक-दोन नव्हे, मोदींचे तब्बल 36 मंत्री जम्मू काश्मीर दौऱ्यावर, कारण काय?
तामिळनाडूतील भाजप नेत्यांमुळे भाजपच्या पक्षश्रेष्ठींवर तोंडघशी पडण्याची वेळ
| Updated on: Jan 17, 2020 | 11:56 AM
Share

श्रीनगर : जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 रद्द करुन आता जवळपास पाच महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. एकीकडे सरकार दावा करत आहे की जम्मू काश्मीरमध्ये सर्वकाही सुरळीत आहे. (Modi Ministers to visit jammu and kashmir ) तर दुसरीकडे सर्वकाही ठिक असेल तर आम्हाला तिकडे जाऊ का दिलं जात नाही, असा प्रश्न विरोधीपक्ष विचारत आहेत. राज्यात संपूर्णपणे इंटरनेटसेवा अजूनही सुरळीत नाही. अनेक नेते आजही नजरकैदेत आहेत. (Modi Ministers to visit jammu and kashmir )

सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपानंतर मोदी सरकारचे तब्बल 36 मंत्री 18 ते 25 जानेवारीदरम्यान जम्मू काश्मीर दौऱ्यावर जाणार आहेत.

ऑल इंडिया रेडिओच्या वृत्तानुसार सर्व मंत्री जम्मू आणि काश्मीरच्या विविध भागात जाऊन, कलम 370 हटवल्यानंतरची परिस्थिती नागरिकांकडून जाणून घेणार आहेत. शिवाय सरकारमार्फत केल्या जाणाऱ्या विकासकामांची माहितीही देणार आहेत.

कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद आणि मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांच्यासह 5 मंत्री काश्मीर खोऱ्यात, तर अन्य सर्व मंत्री जम्मूमध्ये जाऊन प्रचार-प्रसार करणार आहेत.  मोदी सरकारचे हे सर्व मंत्री दोन्ही विभागातील विविध जिल्ह्यात 24 जानेवारीपर्यंत राहतील.

दरम्यान, विरोधकांनी सरकारच्या या निर्णयावरही टीका केली आहे. सरकार आधी कायदा संमत करुन घेते आणि मग नागरिकांकडून त्याला समर्थन मागते, हा मोदी सरकारचा डाव आहे, असं विरोधकांनी म्हटलं.

तर भाजपकडून हा विकास कामांसाठी जम्मू काश्मीर दौरा असल्याचं म्हणत, याबाबत राजकारण न करण्याचं आवाहन केलं आहे.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.