Shivsena | भिवंडीपासून औरंगाबादपर्यंत आदित्य ठाकरेंचा झंझावाती दौरा; उद्यापासून शिवसंवाद यात्रा सुरू

शिव संवाद यात्रेचा प्रारंभ हा दि. 21 जुलै 2022 रोजी भिवंडी येथे दुपारी 12 वाजता संपन्न होणाऱ्या शिवसैनिकांच्या मेळाव्याने होणार असून प्रथम दिवसाच्या यात्रेची सांगता नाशिक येथे सायं ६.३० या वेळेत होणाऱ्या जन मेळाव्याने होणार आहे.

Shivsena | भिवंडीपासून औरंगाबादपर्यंत आदित्य ठाकरेंचा झंझावाती दौरा; उद्यापासून शिवसंवाद यात्रा सुरू
Follow us
| Updated on: Jul 20, 2022 | 2:15 PM

महाराष्ट्रातील (Maharashtra) जनतेशी आणि लाखो मनांशी संवाद साधण्यासाठी शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख माननीय श्री. आदित्य उद्धव ठाकरे, दि. 21 ते 23 जुलै 2022 या काळात महाराष्ट्रातील शिव संवाद यात्रेला सुरुवात करणार आहेत. या यात्रेच्या प्रथम टप्प्यात भिवंडी, नाशिक, दिंडोरी, संभाजीनगर आणि शिर्डीमधील (Shirdi) समाजातील सर्व वयोगट आणि समाज बांधवांशी ते संवाद साधणार आहेत. सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि प्रामुख्याने तरुणांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांचा हा दौरा असेल. सत्तेच्या साठमारीत न पडता समाजकारण करत लोकांच्या समस्यांवर उपाय शोधून त्यांना चिंतामुक्त करणे हेच संकल्पित शिवसंवादाचे उद्दिष्ट आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या या संवाद यात्रेला विशेष महत्त्व तर आहेच, पण त्याहूनही अधिक म्हणजे ही संवादयात्रा समाजातील सर्व स्तरातील जनतेपासून ते शिवसैनिकांमध्ये नवीन ऊर्जा आणणारी ठरणार आहे.

शिव संवाद यात्रा वेळापत्रक

शिव संवाद यात्रेचा प्रारंभ हा दि. 21 जुलै 2022 रोजी भिवंडी येथे दुपारी 12 वाजता संपन्न होणाऱ्या शिवसैनिकांच्या मेळाव्याने होणार असून प्रथम दिवसाच्या यात्रेची सांगता नाशिक येथे सायं ६.३० या वेळेत होणाऱ्या जन मेळाव्याने होणार आहे.

हे सुद्धा वाचा

– दुपारी 12 वाजता भिवंडी येथे मेळाव्याने शिव संवाद यात्रेला सुरुवात – दुपारी 02:30 ते 02:50 शहापूर येथे स्वागत संवाद – दुपारी 03:50 ते 04:15 इगतपुर येथे स्वागतसंवाद – संध्याकाळी 05:45 ते 06:45 वाजता नाशिक येथे शिव संवाद मेळावा

दि. 22 जुलै 2022 या शिव संवाद यात्रेच्या द्वितीय दिवशी सकाळी 11.45 या वेळेत मनमाड शहरात संपन्न होणाऱ्या मेळाव्यात श्री. आदित्य ठाकरे जनतेला संबोधित करणार असून दुसऱ्या दिवसाच्या यात्रेची सांगता संभाजीनगर येथे सायं 6.30 वाजता होणाऱ्या मेळाव्याने होईल.

– सकाळी 11:45 ते दुपारी 12:45 मनमाड येथे शिव संवाद मेळावा – दुपारी 01:40 ते 2 वाजेपर्यँत येवला येथे स्वागत संवाद – दुपारी 02:45 ते 3 वाजेपर्यँत वैजापूर येथे स्वागत संवाद – संध्याकाळी 05:30 ते 06:30 वाजता संभाजीनगर येथे शिव संवाद मेळावा

दि. 23 जुलै 2022 या शिव संवाद यात्रेच्या तिसऱ्या दिवशी सकाळी 11.30 वा पैठण येथे शिवसैनिकांकडून श्री. आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले जाणार आहे. यात्रेची सांगता सायं 5.15 शिर्डी येथे शिर्डी वासीयांकडून आदित्यसाहेबांच्या स्वागताने तसेच लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री. साईंच्या दर्शन आणि आशीर्वादाने होईल.

– सकाळी 11:30 ते दुपारी 12:30 वाजेपर्यँत पैठण येथे स्वागत संवाद – दुपारी 2 ते 02:20 गंगापूर येथे स्वागत संवाद – दुपारी 02:50 ते 4 वाजेपर्यँत नेवासा येथे शिव संवाद मेळावा – संध्याकाळी 04:45 ते 05:15 शिर्डी येथे स्वागत आणि दर्शन

हेडलाईन व्यतिरीक्त सदर वृत्तातील मजकूर tv9marathi ने संपादीत केलेला नसून उपरोक्त माहिती ही सिंडीकेटेड फीडमधून प्रकाशित करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.