AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॅमेऱ्यासमोर सांगतो, आता महाराष्ट्रात… संजय राऊत नेमकं काय म्हणाले? कशा संदर्भात म्हणाले?

समान नागरी कायद्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिाय व्यक्त केली. ड्राफ्ट पाहू,. सामाजिक न्याय काय आहे पाहू. आदिवासी, महिला आणि सर्व धर्माबाबत काय म्हटलं आहे त्याचा अभ्यास करू. त्यानंतर त्यावर बोलता येईल, असं राऊत म्हणाले.

कॅमेऱ्यासमोर सांगतो, आता महाराष्ट्रात... संजय राऊत नेमकं काय म्हणाले? कशा संदर्भात म्हणाले?
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 03, 2023 | 9:49 AM
Share

नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप आला आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलले आहेत. अजित पवार भाजपसोबत आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं काय होणार? असा सवाल केला जात आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एक मोठं विधान करून खळबळ उडवून दिली आहे. राऊत यांच्या या विधानाने खासकरून शिंदे गटात खळबळ उडाली आहे.

संजय राऊत हे दिल्लीत आले आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. महाराष्ट्रातील जनता आमच्यासोबत आहे. आमच्यासोबतच राहील. जनता आम्हाला साथ देणारी आहे. भाजपने राजकीय पक्षांना फोडणं सुरू केलं आहे. महाराष्ट्रात अशी परंपरा कधीच नव्हती. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात असं कधीच झालं नाही. कॅमेऱ्यासमोर सांगतो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलणार आहे. महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळले. एकनाथ शिंदे यांना हटवलं जाणार आहेत. जे चाललं आहे. 16 आमदार बाद होणार आहेत. त्यामुळे अजित पवार यांना गडबडीत घेतलं आहे. अजित पवार मुख्यमंत्री होतील, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

शिंदे जाणार हे निश्चित

भ्रष्टाचाऱ्यांनी तुरुंगात जाव. अजित पवार तुरुंगात खडी फोडतील. भुजबळ खडी फोडतील, असं देवेंद्र फडणवीस म्हणत होते. आता खडी कोण फोडत आहे? देशाच्या राजकारणातील हा गलिच्छ प्रकार आहे, असं संजय राऊत म्हणाले. शिंदे अपात्र होणार हे निश्चित झालं आहे. त्यामुळे भाजपने फोडाफोडी केली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

ती मोदी-शाह यांची देण

राज्यात आयाराम गयारामची संस्कृती सुरू आहे. त्यावरही त्यांनी टीका केली. ही मोदी- शाह यांची देण आहे. मोदी सत्तेत आल्यानंतर देशात नैतिकतेचं राजकारण होईल असं वाटलं होतं. त्यांच्याकडून आशा होती. काँग्रेसने ते केलं नव्हतं. म्हणून काँग्रेस पराभूत झाली होती. तुम्हाला मते मिळाली. पण तुम्ही काँग्रेसपेक्षाही वाईट काम करत आहात, असा हल्लाही त्यांनी चढवला.

अजितदादा जाणार माहीत होतं

अजित पवार जाणार हे आम्हाला माहीत होतं. त्यांनी भाजपसोबत जाण्याचा तीन वेळा प्रयत्न केला. शिंदे जाणार हेही माहीत होतं. ईडीची राजकारण आहे. आमच्या हातात दोन तासासाठी ईडी द्या. मग पाहा महाराष्ट्राचं राजकारण आम्ही बदलून दाखवतो, असंही ते म्हणाले.

मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे
मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे.
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका.
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!.
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार.
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद.
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती.
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष.
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक.