AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वराज्यरक्षकामध्ये धर्मही येतोच, पुरोगामी विचारांबद्दल काय म्हणाले अजित पवार?

भारतीय नागरिक म्हणून कायदा आणि संविधानाचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे मात्र असे करत असताना प्रत्येकाला आपआपली भुमीका मांडण्याचा अधिकार आहे असे अजित पवार म्हणाले.

स्वराज्यरक्षकामध्ये धर्मही येतोच, पुरोगामी विचारांबद्दल काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jan 06, 2023 | 2:09 PM
Share

मुंबई, विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्षाच्या विचारधारेबद्दल भुमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी पक्ष हा सुरवातीपासूनच सर्वधर्म समभाव आणि राष्ट्रपुरूषांच्या विचाराला धरून चालणारा पक्ष आहे. जिवात जिव असे पर्यंत महापुरूषांच्या संस्काराला आणि विचाराला तडा जाऊ देणार नाही असं देखील अजित पवार यावेळी म्हणाले. लोकशाहीत प्रत्येकाला स्वताःचे मत मांडण्याचा अधिकार आहे, मी कुठल्याही महापुरूषांचा अपमाण केलेला नाही असे देखील त्यांनी ठणकावून  सांगीतले.  छत्रपती संभाजी महाराज (Chatrrapati Sambhaji Maharaj) हे धर्मविर नव्हते तर ते फक्त स्वराज्य रक्षक होते अशी भुमीका अजित पवार यांनी सभागृहात मांडली होती. त्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून टिकेची झोड उठली आहे.

स्वराज्यरक्षकामध्ये धर्मही येतोच

भारतीय नागरिक म्हणून कायदा आणि संविधानाचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे मात्र असे करत असताना प्रत्येकाला आपआपली भुमीका मांडण्याचा अधिकार आहे. माझी भुमीका प्रत्येकाला पटलीच पाहिजे हे आवश्यक नाही असे अजित पवार म्हणाले. मी महापुरूषांबद्दल कुठलेही अपशब्द वापरलेले नाही, मात्र सत्ताधारी पक्षाचे मंत्री आणि राज्यपालांच्या वक्तव्यांबद्दल कोणीच बोलायला तयार नाही असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. जाणिवपुर्वक वाताववरण गढूळ करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

स्वराज्यरक्षकामध्ये स्वराज्य, धर्म, संयम, अठरा पगड जाती, बारा बलुतेदार या गोष्टीदेखील येतातच असे म्हणत अजित पवार यांनी त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले.

निवडणूकीचे मुद्दे आताच ओपन करणार नाही

निवडणूकीचे मुद्दे आताच सांगता येणार नाही, कोणताही राजकीय पक्ष इतक्या लवकर आपले मुद्दे उघड करत नाही. निवडणूका आल्यावर बैठका होतील त्यात भुमीकी ठरविली जाईल असे अजित पवार म्हणाले.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान